शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून राजकीय घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:00 IST

अकोला:शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ओळख असणार्‍या महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीवरून भाजपाच्या दोन गटांत चांगलेच घमासान रंगल्याचे चित्र आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणाचे बळी ठरलेल्या आयुक्त लहाने यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागातून जारी न होता महसूल विभागातून निघाल्यामुळे प्रशासकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आयुक्त अजय लहाने यांच्यासारख्या खमक्या अधिकार्‍याची गरज असताना त्यांची बदली होणे कितपत योग्य, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

ठळक मुद्देभाजपातील अंतर्गत राजकारणाचा आयुक्तांना फटकानगरसेवकांची नाराजी कशासाठी?समन्वयाची भूमिका अंगलट

आशिष गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ओळख असणार्‍या महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीवरून भाजपाच्या दोन गटांत चांगलेच घमासान रंगल्याचे चित्र आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणाचे बळी ठरलेल्या आयुक्त लहाने यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागातून जारी न होता महसूल विभागातून निघाल्यामुळे प्रशासकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आयुक्त अजय लहाने यांच्यासारख्या खमक्या अधिकार्‍याची गरज असताना त्यांची बदली होणे कितपत योग्य, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.आज रोजी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. जिल्ह्याची सूत्रे खासदार संजय धोत्रे यांच्याकडे असून, सलग पाचव्यांदा विजयश्री प्राप्त करणारे आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांचा त्यांच्या मतदारसंघापुरताच नव्हे, तर जिल्ह्यात प्रभाव असल्याचे कोणीही नाकारत नाही. या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात महापालिका क्षेत्राचा अंतर्भाव होतो. त्यामुळे साहजिकच शहराच्या विकास कामांसाठी निधी खेचून आणणे आणि त्याद्वारे रखडलेल्या विकास कामांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी दोन्ही आमदार कमालीचे आग्रही असल्याचे दिसून येते. विकास कोणत्याही क्षेत्राचा-भागाचा असो, त्यासाठी निधी खेचून आणणारे जनप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचा आपसातील समन्वय मोलाचा ठरतो. सप्टेंबर २00१ मध्ये स्थापना झालेल्या महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारणार्‍या विविध अधिकार्‍यांच्या कार्यशैलीबद्दल अकोलेकर चांगलेच परिचित आहेत. मनपाची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी बिंदूनामावली, आकृतिबंधाचा विषय हाती घेतला. थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्यासाठी उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले. दुसरीकडे प्रशस्त रस्त्यांचे निर्माण व्हावे, यासाठी रस्त्यालगतची धार्मिक स्थळे हटवली. पाणीपुरवठय़ाची कामे निकाली काढण्यासाठी जलवाहिनीचे जाळे टाकले. घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी १२५ वाहनांची व्यवस्था केली. ही बोटावर मोजता येणारी उदाहरणे असून, आयुक्तांच्या रोखठोक भूमिकेमुळे शहर विकासाची गाडी रुळावर आल्याची वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत केवळ पक्षांतर्गत राजकारणातून त्यांची बदली होणे अकोलेकरांना अपेक्षित नाही. 

नगरसेवकांची नाराजी कशासाठी?प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलल्या जाते. कारणमीमांसा केली असता कागदोपत्री लाखो रुपयांची कामे दाखवून देयक काढण्याचे प्रकार कधीचेच बंद झाले आहेत. असे प्रकार पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकांचे हात शिवशिवत आहेत. त्यासाठी आयुक्तांची बदली अत्यावश्यक झाल्याचे चित्र समोर आले आहे.

समन्वयाची भूमिका अंगलटमनपाची सत्तासूत्रे भाजपाच्या हातामध्ये जाऊन महापौरपदी विजय अग्रवाल विराजमान झाले. महापौर विजय अग्रवाल आणि आयुक्त अजय लहाने यांच्यातील वाढता समन्वय पक्षांतर्गत डोकेदुखी ठरू लागल्याची चर्चा आहे. शिवाय, प्रत्येक ठिकाणी आयुक्तांची चौकस बुद्धी आडवी येत असल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी भाजपानेच पुढाकार घेतला, हे येथे उल्लेखनीय. यामुळे आगामी दिवसांत मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असा मनपाचा कारभार पारदश्री चालेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.