शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खासदारांच्या वक्तव्याने सामाजिक कार्यक्रमाला राजकीय रंग!

By admin | Updated: July 6, 2015 01:32 IST

धोत्रेंचा टोला कुणाला? ; मारवाडी युवा मंचच्या प्रांतीय अधिवेशनात चर्चेला उधाण.

अकोला : भाजप सरकारमध्ये मारवाडी नेता नसल्याने हे सरकार जास्त काळ चालणार नाही, असे मारवाडी युवा मंचच्या प्रांतिय अधिवेशनात एका पदाधिकार्‍याने केलेले वक्तव्य आणि त्यानंतर जबाबदारीची जाणीव नसलेल्यांनाही सत्तेची स्वप्नं पडत असल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे प्रति पादन, यामुळे रविवारी अकोल्यात आयोजित केलेल्या एका सामाजिक कार्यक्रमास राजकीय रंग चढला. संजय धोत्रे यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाच्या दिशेने होता, मारवाडी समाजाच्या, की आणखी कुणाच्या, या प्रश्नावर कार्यक्रमस्थळी चर्चा रंगली होती. महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचतर्फे रविवारी अकोला येथे प्रांतिय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अकोला-वाशिमचे पालकमंत्री त था गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष निकेश गुप्ता होते. खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल, पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जाजोदिया, अग्रसेवा दलाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, अ.भा. मारवाडी युवा मंचचे माजी अध्यक्ष ओम पाटणी, महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, वीरेंद्रप्रकाश धोका, राष्ट्रवादी काँग्रेचे अकोला शहर अध्यक्ष अजय तापडिया, माजी आमदार बबनराव चौधरी, जयप्रकाश मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव वीरेंद्रप्रकाश धोका यांनी मार्गदर्शन करताना, ह्यमारवाडी नेता नसेल, तर सध्याचे सरकार चालणार नाहीह्ण असे वक्तव्य केले. त्यानंतर खासदार धोत्रे यांनी भाषण देताना, ह्यज्याला जबाबदारीची जाणीव नाही, त्याला पण सत्तेची स्वप्नं पडत आहेतह्ण, असे वक्तव्य केले. जबाबदारीची कामे सोडून सत्तेत येण्यासाठी खटाटोप केला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. संजय धोत्रे यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस् थळी चर्चा रंगली. त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाच्या दिशेने होता, यावर उपस्थितांनी अंदाज बांधण्यास सुरूवात केली. काहींनी त्यांच्या वक्तव्याचा रोख मारवाडी समाजाच्या दिशेने असल्याचा अंदाज बांधून नाराजी व्यक्त केली, तर काहींच्या मते त्यांच्या या वक्तव्याशी मारवाडी समाजाचा काहीही संबंध नव्हता. धोत्रेंच्या वक्तव्याचा रोख कुणाच्याही दिशेने असो, एक मात्र नक्की, त्यांच्या वक्तव्याने सामाजिक कार्यक्रमाच्या तंबुचे राजकीय चावडीत रूपांतर झाले होते.