शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पातूर तालुक्यात पोलीस पाटलांची पदे रिक्त, पोलिसांचा ताण वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:20 IST

पातूर : पोलीस आणि महसूल प्रशासनाचा गावपातळीवरील महत्त्वाचा दुवा असलेली पोलीस पाटील ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे ८८ ...

पातूर : पोलीस आणि महसूल प्रशासनाचा गावपातळीवरील महत्त्वाचा दुवा असलेली पोलीस पाटील ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे ८८ गावांचा कारभार २१ पोलीस पाटलांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे.

पोलीस पाटील हे पद छत्रपती शिवरायांच्या काळापासून कायम आहे. पोलीस प्रशासन महसूल आणि विविध शासकीय यंत्रणांना मदतगार असणारे हे पद गाव पातळीवर आजही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. मात्र पातूर तालुक्यात ८८ गावांची संख्या आहे. त्यामध्ये पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ४४ गावांसाठी २८ पदे मंजूर आहेत. यातील १० पदे रिक्त आहेत. चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत ४४ गावांसाठी २८ पदे मंजूर आहेत. १५ पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या २१ गावांच्या पोलीस पाटलांना ३५ ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे पोलीस विभागाचा ताण अधिकच वाढला आहे. गावपातळीवर अवैध धंद्यांना गावागावात ऊत आला आहे. त्याबरोबरच गुन्हेगारीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी

सण-उत्सव शेतकऱ्यांच्या धुऱ्याचे, गावकऱ्यांचे मालमत्तांची भांडणे, गावच्या हद्दीत गुन्हा घडून नये, असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढू नये हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेणे कायदा-सुव्यवस्था याचे पालन करणे, गाव पातळीवर विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती देणे, गावपातळीवर अवैध धंद्यांना प्रतिबंध घालून, गौण खनिज याची चोरी थांबविणे यासह पोलीस प्रशासन महसूल आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या कामाची अंमलबजावणी करणे आदी विविध प्रकारची कामे पोलीस पाटलांना करावी लागतात. त्यांना पोलिसांचा तिसरा डोळासुद्धा म्हटले जाते.

तंटामुक्ती समित्या नावालाच

पोलीस पाटलांच्या सोबतच शासनाने तंटामुक्ती समिती निर्माण केली होती. मात्र त्या समित्यांचा कोणत्या स्तरावर आढावा घेतला जात नसल्यामुळे या यंत्रणेचा फायदा आहे शासन व्यवस्थेला होत नाही. जिल्ह्यात दिवसाढवळ्या दरोडे चोऱ्या घडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलीस पाटील या पदाच्या रिक्त ठिकाणी नेमणुका करणे महत्त्वपूर्ण झाले आहे.

पातूर तालुक्यातील बहुतांश गावचे पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत पोलीस पाटलांवर कमालीचा ताण वाढला आहे. शासनाने तातडीने रिक्त जागांवर पोलीस पाटलांची तातडीने नियुक्ती करावी.

-राजूभाऊ बाबाराव देशमुख, तालुकाध्यक्ष पोलीस पाटील संघटना, पातूर