शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पोलिसांची दिरंगाई उठली चिमुकलीच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST

नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय  चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट  फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला  शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास  दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.  अकोट फैल पोलीस ठाण्यात दुसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने  पोलिसांची दिरंगाईच चिमुकलीच्या जीवावर उठल्याची चर्चा  संपूर्ण पोलीस वतरुळात सुरू आहे.

ठळक मुद्देअकोला पोलिसांची लक्तरे वेशीलाखुलेआम खून अन् दरोड्यांचे सत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय  चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट  फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला  शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास  दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.  अकोट फैल पोलीस ठाण्यात दुसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने  पोलिसांची दिरंगाईच चिमुकलीच्या जीवावर उठल्याची चर्चा  संपूर्ण पोलीस वतरुळात सुरू आहे. कुठलीही १८ वर्षाखालील मुलगी-मुलगा बेपत्ता झाल्यास  बेपत्ता झाल्याची तक्रार न घेता तातडीने अपहरणाचा गुन्हा  दाखल करून एक पथक गठित करावे आणि तातडीने अ पहरण झालेल्या अल्पवयीन मुलगा-मुलीचा शोध घेण्याचे  आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत; मात्र असे असतानाही  आलिया परवीन ही चिमुकली शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी बेपत्ता  झाली. तिचे अशिक्षित आई-वडील तक्रार देण्यास आले; मात्र  अकोट फैल पोलिसांनी त्यांनाच मुलीला शोधण्याचा सल्ला  देऊन प्रकरणात टोलवा-टोलवी केल्याचा आरोप मुलीच्या  िपत्याने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने शोध घेतला असता  तर मुलीचे प्राण वाचले असते, असेही समोर येत आहे. या  हत्याकांडाला आता चार दिवस उलटले व पोलिसांनी गुन्हा  दाखल करून दोन दिवस उलटले; मात्र त्यानंतरही अकोट  फैल पोलीस अंधारात तीर मारत आहेत. गरीब व अशिक्षित असलेल्या तिच्या आई-वडिलांना  पोलिसांनी तातडीने सहकार्य केले असते तर परिस्थिती  वेगळी असती, अशी अपेक्षा तिच्या आई-वडिलांनी केली  आहे; मात्र पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने मुलीची  अशा प्रकारे निर्मम हत्या झाल्याचाही आरोप त्यांनी केला  आहे. 

पोलिसिंग एवढी सुस्त का?या चिमुकलीच्या हत्याकांडासोबतच चोर्‍यांचे सत्र, दरोडे व  खंडणीखोरांचा हैदोस जोरात सुरू आहे. तत्कालीन पोलीस  अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी निर्माण केलेला पोलिसांचा  दरारा त्यांची बदली होताच गुंड व चोरट्यांनी पायदळी  तुडविला आहे; मात्र त्यानंतरही पोलीस यंत्रणा एवढी सुस्त  का, असा सवाल सामान्य व्यक्तींकडून करण्यात येत आहे.  पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बघून हजारोंची मने  हेलावली. पोलिसांकडूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात  आला; मात्र तिचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत.अकोला पोलिसांच्या इतिहासात हुक्का पार्लरचा पर्दाफाश  पहिल्यांदा झाला. यावरून अवैध धंदे कशा प्रकारे वाढले, हे  दिसून येते. ज्या परिसरात चिमुकलीचे हत्याकांड घडले,  त्याच परिसरात मोठे धंदेही सुरू असल्याचे वृत्त आहे.