शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पोलिसांची दिरंगाई उठली चिमुकलीच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST

नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय  चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट  फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला  शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास  दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.  अकोट फैल पोलीस ठाण्यात दुसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने  पोलिसांची दिरंगाईच चिमुकलीच्या जीवावर उठल्याची चर्चा  संपूर्ण पोलीस वतरुळात सुरू आहे.

ठळक मुद्देअकोला पोलिसांची लक्तरे वेशीलाखुलेआम खून अन् दरोड्यांचे सत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय  चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट  फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला  शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास  दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.  अकोट फैल पोलीस ठाण्यात दुसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने  पोलिसांची दिरंगाईच चिमुकलीच्या जीवावर उठल्याची चर्चा  संपूर्ण पोलीस वतरुळात सुरू आहे. कुठलीही १८ वर्षाखालील मुलगी-मुलगा बेपत्ता झाल्यास  बेपत्ता झाल्याची तक्रार न घेता तातडीने अपहरणाचा गुन्हा  दाखल करून एक पथक गठित करावे आणि तातडीने अ पहरण झालेल्या अल्पवयीन मुलगा-मुलीचा शोध घेण्याचे  आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत; मात्र असे असतानाही  आलिया परवीन ही चिमुकली शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी बेपत्ता  झाली. तिचे अशिक्षित आई-वडील तक्रार देण्यास आले; मात्र  अकोट फैल पोलिसांनी त्यांनाच मुलीला शोधण्याचा सल्ला  देऊन प्रकरणात टोलवा-टोलवी केल्याचा आरोप मुलीच्या  िपत्याने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने शोध घेतला असता  तर मुलीचे प्राण वाचले असते, असेही समोर येत आहे. या  हत्याकांडाला आता चार दिवस उलटले व पोलिसांनी गुन्हा  दाखल करून दोन दिवस उलटले; मात्र त्यानंतरही अकोट  फैल पोलीस अंधारात तीर मारत आहेत. गरीब व अशिक्षित असलेल्या तिच्या आई-वडिलांना  पोलिसांनी तातडीने सहकार्य केले असते तर परिस्थिती  वेगळी असती, अशी अपेक्षा तिच्या आई-वडिलांनी केली  आहे; मात्र पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने मुलीची  अशा प्रकारे निर्मम हत्या झाल्याचाही आरोप त्यांनी केला  आहे. 

पोलिसिंग एवढी सुस्त का?या चिमुकलीच्या हत्याकांडासोबतच चोर्‍यांचे सत्र, दरोडे व  खंडणीखोरांचा हैदोस जोरात सुरू आहे. तत्कालीन पोलीस  अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी निर्माण केलेला पोलिसांचा  दरारा त्यांची बदली होताच गुंड व चोरट्यांनी पायदळी  तुडविला आहे; मात्र त्यानंतरही पोलीस यंत्रणा एवढी सुस्त  का, असा सवाल सामान्य व्यक्तींकडून करण्यात येत आहे.  पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बघून हजारोंची मने  हेलावली. पोलिसांकडूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात  आला; मात्र तिचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत.अकोला पोलिसांच्या इतिहासात हुक्का पार्लरचा पर्दाफाश  पहिल्यांदा झाला. यावरून अवैध धंदे कशा प्रकारे वाढले, हे  दिसून येते. ज्या परिसरात चिमुकलीचे हत्याकांड घडले,  त्याच परिसरात मोठे धंदेही सुरू असल्याचे वृत्त आहे.