शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

२६ बिल्डरांविरूद्ध पोलीस तक्रार

By admin | Updated: January 21, 2015 01:14 IST

अकोला शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकरण; २ जणांविरूद्ध गुन्हा दाखल.

अकोला : शहरातील १८७ निर्माणाधीन इमारतींचे बांधकाम थांबवण्याचे आदेश जारी केल्यानंतर महापालिकेने २६ बांधकाम व्यावसायिकांविरोधात मंगळवारी रात्री विविध पोलीस ठाण्यांमध्ये फ ौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केली. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात २ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मनपा क्षेत्रातील निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नगररचना विभागाला एप्रिल २0१४ मध्ये दिले होते. यामध्ये १८७ इमारतींचे मोजमाप नियमापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यानंतर बांधकाम बंद करण्याचे निर्देश डॉ. कल्याणकर यांनी दिले. नगररचना विभागाने नियमानुसार नकाशा मंजूर करण्याचे आदेश कल्याणकरांनी दिल्यानंतर नऊ महिन्यांमध्ये अवघे १३ नकाशे मंजूर करण्यात आले. यातही वैयक्तिक बांधकाम नकाशांचा समावेश आहे. या दरम्यान संबंधित व्यावसायिकांनी अतिरिक्त बांधकाम स्वत:हून काढावे, अन्यथा मनपाकडून पाडले जाणार असल्याबाबत नोटीस नगररचना विभागाने जारी केल्या होत्या. यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नोटीसला उत्तरच दिले नाही. त्यामुळे नगररचना विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये पोलिसांत फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल लाईन पोलीसांनी अनिल चौधरी व सौरभ अग्रवाल यांच्याविरूद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, पश्‍चिमचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, उत्तर झोनचे अधिकारी राजेंद्र घनबहाद्दुर व दक्षिणचे झोन अधिकारी कैलास पुंडे यांनी मंगळवारी रात्री २६ बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात झोननिहाय पोलीस तक्रारी केल्या. ही माहिती कानावर येताच संबंधित व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, जामिनासाठी धावपळ सुरू झाली आहे. केड्राईचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी अकोला मनपासाठी स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा (डीसी रूल) प्रस्ताव नुकताच शासनाकडे सादर करण्यात आला असून या मुद्दय़ावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. हा प्रस्ताव लागू झाल्यास ८0 बांधकामांना दिलासा मिळू शकतो. अशा स्थितीत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगीतले. तर मनपाचे , साहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे यांनी मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये फौजदारी तक्रार करण्यात आली. टप्प्याटप्प्याने सर्व बांधकाम व्यावसायिकांविरोधात तक्रारी नोंदवल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.