शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकीही भुईसपाट!

By admin | Updated: March 5, 2017 01:49 IST

चौथ्या दिवशीही अकोटात राबविली अतिक्रमण हटाव मोहीम.

अकोट, दि. ४- अकोट-अंजनगाव मार्गावर असलेल्या अतिक्रमणामधील अकोट शहर पोलीस स्टेशनची पोलीस चौकी ४ मार्च रोजी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत भुईसपाट करण्यात आली. गत चार दिवसांपासून या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये चौपदरीकरणाकरिता रस्त्याच्या आड येत असलेली अतिक्रमणे पाडण्यात येत आहेत. आतापर्यंत ७५ च्यावर घरे पाडण्यात आली असून, किरकोळ अतिक्रमणसुद्धा पाडण्यात आले आहे. नगर परिषदेपासून खाई नदीच्या पुलापर्यंंत या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. यामध्ये शनिवारी उर्दू शाळेसमोरील धारुळी वेसवर पक्के बांधकाम केलेली पोलीस चौकीसुद्धा भुईसपाट करण्यात आली. या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमण पाडण्यात आल्याने रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात मलबा पडला आहे. काही घरे व पक्क्या इमारतींसमोरील भाग पाडण्यात आला आहे. शिवाय, अतिक्रमण पाडल्यानंतर पाणीपुरवठय़ाची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही मोहीम अजूनही तीन ते चार दिवस सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी गीता ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता घुमरे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असून, मोहिमेमध्ये कार्यालय पर्यवेक्षक मयूरी जोशी, आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार, गजानन महल्ले, मोहन नाथे, न.पा. अभियंता स्नेहल बोमकंटीवार, संजय अढाऊ आदींसह विविध विभागाचे कर्मचारी हजर होते. पक्की अतिक्रमणे अर्धवट पाडली अंजनगाव मार्गावरील गोरगरिबांची घरे पूर्णत: भुईसपाट करण्यात आली आहेत, त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरकुलेसुद्धा पाडण्यात आली आहेत. काही बिल्डर लॉबीने या मार्गावर पक्की बांधकामे करून दुकाने बांधली आहेत. नगर परिषदेची बांधकाम परवानगीसुद्धा घेण्यात आली नाही, अशी अतिक्रमणे मात्र अर्धवट स्थितीतच पाडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या गरिबांची घरे पूर्णत: पाडण्यात आली. त्यांच्यामध्ये या मोहिमेतील धरसोडवृत्ती पाहून भेदभावाची भावना निर्माण होत आहे. प्रशासनाने कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता व भेदभाव न करता पारदर्शकपणे ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.