शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पोलीस आपल्या शिवारात अभियान !

By admin | Updated: July 17, 2017 03:08 IST

पोलीस अधीक्षकांची संकल्पना: पोलीस गावांमध्ये जाऊन नागरिकांसोबत साधणार संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होऊन समन्वय राखल्या जावा, यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून पोलीस आपल्या शिवारात अभियान १७ ते २३ जुलैदरम्यान राबविण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचारी गावांमध्ये जाऊन नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या, सण, उत्सव आणि गावातील परिस्थितीची माहिती जाणून घेतील. नुकतेच संपलेले शेतकरी आंदोलन, पावसाची अनियमितता, येणारा पोळा उत्सव या पृष्ठभूमीवर पोलीस आणि ग्रामीण भागातील नागरिक विशेषत: शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी आणि समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस आपल्या शिवारात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार पोलीस ठाण्याचे ठाणेदार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, अंमलदार हे हद्दीतील गावांना भेटी देऊन तेथील नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्यांसह सण, उत्सव आणि गावातील जातीय परिस्थिती, गतकाळात घडलेल्या घटना याबाबत माहिती जाणून घेतली. नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पोलिसांची प्रतिमा उंचाविण्यासाठी आणि पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी, ही या अभियानामागील भावना असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्पष्ट केले आहे. या अभियानाचा प्रारंभ खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम चांदुर येथून होणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे उपस्थित राहून नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस आपल्या शिवारात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्त ग्राम समिती, शाळा मुख्याध्यापक, कृषी सहायक, राजकीय नेते यांचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे. पोलीस मित्र, ग्रामरक्षक सदस्य नोंदणीही करणार!गावांमधील घटना, घडामोडींची पोलिसांना माहिती व्हावी, गावामध्ये शांतता नांदावी, यासाठी पोलीस दलाच्यावतीने पोलीस मित्र व ग्रामरक्षक सदस्य नोंदणीवर भर देण्यात येत आहे. पोलीस आपल्या शिवारात अभियानादरम्यान अनेक गावांमध्ये जाऊन पोलिसांकडून पोलीस मित्र आणि ग्रामरक्षक सदस्य नोंदणीसुद्धा करण्यात येणार आहे.