शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांने थांबविली शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: May 25, 2017 20:17 IST

तेल्हारा : तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची तालुक्यातील सर्वात मोठी मार्केट असून तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादित माल या मार्केटमध्ये विक्रीकरिता आणतात.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची तालुक्यातील सर्वात मोठी मार्केट असून तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादित माल या मार्केटमध्ये विक्रीकरिता आणतात. आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकरी ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनामध्ये माल विक्रीकरिता आणतात. वाहनांमधून येणाऱ्या धान्याचे मोजमाप स्वयंचलित भुईकाट्यावर केले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून भुईकाट्यावर मोजमाप केलेल्या मालामधून प्रतिक्विंटल अर्धाकिलो लेस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या काटापट्टीतून कापल्या जाते. कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नसताना दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांकरवी शेतकऱ्यांची आर्थिक लूट मार्केटमध्ये सुरू होती. साधारणपणे एक ट्राली तुरीमध्ये एक हजार रुपये हरभऱ्याच्या ट्रालीमागे बाराशे रुपये तर सोयाबीनच्या ट्रालीमागे पाचशे रुपयाचे आर्थिक नुकसान या लेसमुळे शेतकऱ्यांना सहन करावे लागत असे. म्हणजे वर्षाकाळी लाखो रुपयाचे नुकसान बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे होत राहिले आहे. बाजार समितीमध्ये निवडून येणारे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत असले तरी या अन्यायाबद्दल एकाही संचालकाने याबद्दल आजपर्यंत एक चकार शब्दही काढला नाही, हे विशेष.युवाशक्ती संघटनेचे खापरखेड येथील जागरूक कार्यकर्ते व शेतकरी नारायण नामदेव भोकरे यांनी त्यांच्याकडील ासेयाबीन बाजार समितीमध्ये विक्रीस आणून महेश ट्रेडिंग कंपनीमार्फत विकले. त्यंच्या मालाच्या काटापट्टीतून प्रतिक्विंटल अर्धा किलो लेस संबंधित व्यापाऱ्याने कापल्यानंतर त्यांनी बाजार समितीकडे रितसर तक्रार दाखल करून बाजार समितीला धारेवर धरले. अखेर बाजार समितीला यावर योग्य पाऊल उचलने भाग पडले. यामुहे बाजार समितीने लेस घेण्यास प्रतिबंध करणारा आदेश काढून संबंधित व्यापाऱ्यावर नोटीसे बजावल्या. बाजार समितीला लेसला प्रतिबंधक करणारा फलक बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा लागला. नारायण भोकरे यांच्या जागरुकतेमुळे शेतकऱ्यांचे वर्षाकाठी लाखो रुपयाचे नुकसान थांबले आहे. नारायण भोकरे यांचे जागरुकतेबद्दल युवाशक्ती संघटनेचे भवानीप्रताप, उत्तम नळकांडे, विजय बोर्डे व वैभव पोटे यांनी त्यांचे कौतुक केले असून कुठल्याही व्यापाऱ्याने काटापट्टीतून लेस कापल्यास बाजार समितीकडे तक्रार करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.