शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

प्लास्टिक बंदी : शासनाचे विभाग अनभिज्ञ, अधिसूचनेनुसार कारवाईसाठी निर्देशच दिले नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 13:36 IST

अकोला : प्लास्टिक बंदी करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्या विभागांना देण्यात आले, त्यातील बऱ्यांच विभाग प्रमुखांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांना अधिसूचनेनुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले नाही.

ठळक मुद्दे कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका, नगर परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे, या भ्रमातच शासनाचे इतर विभाग आहेत. शासनाने २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतच प्लास्टिक बंदी करण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार असलेले विभाग निर्देशित केले आहेत. प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे शासनाच्या यंत्रणांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

अकोला : प्लास्टिक बंदी करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्या विभागांना देण्यात आले, त्यातील बऱ्यांच विभाग प्रमुखांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांना अधिसूचनेनुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले नाही. ग्रामसेवक, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाकडून कारवाईसाठी जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देत कारवाई करण्याचे बजावले, तर जिल्हाधिकारी कार्यालयातून उद्या बुधवारी तसा आदेश दिला जाणार आहे.प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका, नगर परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे, या भ्रमातच शासनाचे इतर विभाग आहेत. शासनाने २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतच प्लास्टिक बंदी करण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार असलेले विभाग निर्देशित केले आहेत. त्यामध्ये अनेक विभागांचा समावेश आहे. प्रामुख्याने महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते; मात्र या विभागाच्या अधिकाºयांना जबाबदारीबद्दल माहितीच नसल्याने मंगळवारी पुढे आले. ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर उद्या बुधवारी संबंधितांना पत्र दिले जातील, पथके गठित केली जातील, असे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, शासनाने प्लास्टिक बंदी करण्यामागची कारणेही स्पष्ट केली आहेत. त्यामध्ये प्लास्टिक कचऱ्यामुळे व मायक्रो प्लास्टिकमुळे सागरी जीव, नदी-नाल्यातील जलचर व जैवविविधतेवर परिणाम होतो. शेती, वने या ठिकाणी प्लास्टिकमुळे उपयुक्त नैसर्गिक घटक व साधनसंपत्तीचा ºहास होतो. त्याशिवाय, मानवी आरोग्यावरही भयंकर परिणाम होतो. त्यासाठी प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे शासनाच्या यंत्रणांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

 कारवाईची विविध विभागांवर जबाबदारीकायद्यानुसार प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईसाठी विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिका आयुक्तांसह सर्व यंत्रणा, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, उप-जिल्हाधिकारी, उप-विभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य संचालकांसह यंत्रणा, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस निरीक्षक, उप-निरीक्षक, मोटर वाहन निरीक्षक, वाहतूक पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा, पर्यटन विकास महामंडळ यंत्रणा, फॉरेस्ट रेंज आॅफिसर, उप-वनसंरक्षक यंत्रणा या विभागांवर कारवाईची धुरा देण्यात आली आहे.प्लास्टिक बंदीच्या अधिसूचनेतील निर्देशानुसार महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांना कारवाईचे अधिकार देण्यात आले. सर्व संबंधितांना लवकरच पत्र देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल. महसूल विभागही अधिकारानुसार निश्चित कारवाई करणार आहे.

- श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी. पुरवठा विभागातील कर्मचाºयांची पथके गठित करून प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील. शासनाच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांची माहिती पथकाला दिली जाईल. प्रभावीपणे मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.

- संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्लास्टिक बंदीचा कायदाच आहे. कायद्याने ठरवून दिलेली जबाबदारी पार पाडणे सर्वांचे कर्तव्य आहे. पोलीस विभागही कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करणारच आहे. त्यासाठी कार्यालयातून आणखी पत्र देणे अपेक्षित नाही. नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडल्यास कारवाईची वेळ येणार नाही.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक 

 

टॅग्स :AkolaअकोलाPlastic banप्लॅस्टिक बंदी