शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच!

By admin | Updated: July 7, 2017 01:48 IST

जिल्ह्यात अनेक ठिकाणी खड्ड्यातील रोपटे गायब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या वतीने राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलैदरम्यान वृक्षारोपण करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांच्या वतीने केलेले वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच असल्याचे ६ जुलै रोजी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. तेल्हारा, पातूर, बाळापूर शहरात शासकीय कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी केवळ खड्डेच उरले असून, त्यातील रोप गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा वन परिक्षेत्रातही असेच चित्र आहे. तेल्हारा शहरात पंचायत समिती कार्यालय व कृषी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले; मात्र वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच झाले आहे. या झाडांची नीगा राखायची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नसल्याने अनेक झाडे सुकली आहेत. पंचायत समिती परिसरातील अनेक झाडांची ट्री गार्ड बाजूला पडलेली आढळली व त्यातील झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. कृषी कार्यालयातील रोपांचीही तीच अवस्था झाली आहे. तालुक्यात वृक्ष लागवडही संथगतीने सुरू आहे. उद्दिष्ट ५,२०० झाडांचे असताना आतापर्यंत केवळ फक्त १०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे, उद्दिष्टपूर्ती तर दूरच त्याच्या जवळही जाणे अशक्यच असल्याचे दिसत आहे. पातुरात केवळ खड्डेच खोदले! पातूर शहरातही अनेक रोप सुकल्याचे चित्र आहे. तालुक्यात ४८ हजार ३५० वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट देण्यात आले. २४० ठिकाणी आतापर्यंत ३६ हजार ४६६ रोप लागवड करण्यात आल्याचे रोप लागवडचे पातूर तालुका समन्वयक तथा वन विभागाचे आरएफओ जी. डी. देशमुख यांनी सांगितले; मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता नगरपालिकेच्या आवारात रोप लागवड न करताच फक्त खड्डेच करण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये रोपांचे रोपण न करता करता खड्ड्याच्या बाजूलाच रोपटे टाकून देण्यात आले आहे. त्या ठिकाणी जवळपास ८० रोप लागवड करण्यात आली आहे. पातूर परिसरातील कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या रोपांचीही अवस्था दूर्लक्षीत झाली असून, झाडे सुकली आहेत. लोहगड वन वर्तुळातील वृक्ष सुकले बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड वन वर्तुळातील कं पार्टमेंट नं. ११२ मध्ये २५ हेक्टर क्षेत्रफळावर १३ हजार २५० रोपांची लागवड करण्यातआली; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे लक्षच दिले नसल्याने यातील अनेक रोप पाण्याभावी सुकली आहेत. यातील किती रोप प्रत्यक्ष जगतील यामध्ये संशयच आहे. लोहगड ते सकणी मार्गावर सामाजिक वनीकरणचे अनेक रोप रस्त्याच्या दुतर्फा करपलेल्या अवस्थेत दिसत आहेत. वनपरिक्षेत्र कार्यालयाने ८२ गावांना ३२ हजार ८०० रोपांचा पुरवठा केला. यातील काही रोपे ग्रामपंचायतींनी लावली तर काही ठिकाणी तशीच पडून आहेत. रोपे जगवण्याची जबाबदारी निश्चित नसल्याने त्यांचे संवर्धन होत नसल्याचे चित्र आहे. बाळापुरात खड्डेच उरले! शासनाने उद्दिष्ट दिले म्हणून बाळापूर शहरातील विविध शाासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले; मात्र त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी न घेल्याने अनेक वृक्ष सुकली आहेत. पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या वृक्षांना पाणीच देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. नगरपालिका उद्यानात रोपे गायब असून, तेथे पिशव्याच शिल्लक उरल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वृक्षारोपणासाठी खोदलेले खड्डेच शिल्लक आहेत. त्यातील रोपे पाण्याअभावी सुकली आहेत.