शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
4
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
5
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
6
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
7
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
9
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
10
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
11
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
12
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
13
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
14
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
15
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
16
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
17
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
18
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
19
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
20
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!

वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच!

By admin | Updated: July 7, 2017 01:48 IST

जिल्ह्यात अनेक ठिकाणी खड्ड्यातील रोपटे गायब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या वतीने राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलैदरम्यान वृक्षारोपण करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांच्या वतीने केलेले वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच असल्याचे ६ जुलै रोजी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. तेल्हारा, पातूर, बाळापूर शहरात शासकीय कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी केवळ खड्डेच उरले असून, त्यातील रोप गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा वन परिक्षेत्रातही असेच चित्र आहे. तेल्हारा शहरात पंचायत समिती कार्यालय व कृषी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले; मात्र वृक्षारोपण केवळ फोटोसेशनपुरतेच झाले आहे. या झाडांची नीगा राखायची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नसल्याने अनेक झाडे सुकली आहेत. पंचायत समिती परिसरातील अनेक झाडांची ट्री गार्ड बाजूला पडलेली आढळली व त्यातील झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. कृषी कार्यालयातील रोपांचीही तीच अवस्था झाली आहे. तालुक्यात वृक्ष लागवडही संथगतीने सुरू आहे. उद्दिष्ट ५,२०० झाडांचे असताना आतापर्यंत केवळ फक्त १०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे, उद्दिष्टपूर्ती तर दूरच त्याच्या जवळही जाणे अशक्यच असल्याचे दिसत आहे. पातुरात केवळ खड्डेच खोदले! पातूर शहरातही अनेक रोप सुकल्याचे चित्र आहे. तालुक्यात ४८ हजार ३५० वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट देण्यात आले. २४० ठिकाणी आतापर्यंत ३६ हजार ४६६ रोप लागवड करण्यात आल्याचे रोप लागवडचे पातूर तालुका समन्वयक तथा वन विभागाचे आरएफओ जी. डी. देशमुख यांनी सांगितले; मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता नगरपालिकेच्या आवारात रोप लागवड न करताच फक्त खड्डेच करण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये रोपांचे रोपण न करता करता खड्ड्याच्या बाजूलाच रोपटे टाकून देण्यात आले आहे. त्या ठिकाणी जवळपास ८० रोप लागवड करण्यात आली आहे. पातूर परिसरातील कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या रोपांचीही अवस्था दूर्लक्षीत झाली असून, झाडे सुकली आहेत. लोहगड वन वर्तुळातील वृक्ष सुकले बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड वन वर्तुळातील कं पार्टमेंट नं. ११२ मध्ये २५ हेक्टर क्षेत्रफळावर १३ हजार २५० रोपांची लागवड करण्यातआली; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे लक्षच दिले नसल्याने यातील अनेक रोप पाण्याभावी सुकली आहेत. यातील किती रोप प्रत्यक्ष जगतील यामध्ये संशयच आहे. लोहगड ते सकणी मार्गावर सामाजिक वनीकरणचे अनेक रोप रस्त्याच्या दुतर्फा करपलेल्या अवस्थेत दिसत आहेत. वनपरिक्षेत्र कार्यालयाने ८२ गावांना ३२ हजार ८०० रोपांचा पुरवठा केला. यातील काही रोपे ग्रामपंचायतींनी लावली तर काही ठिकाणी तशीच पडून आहेत. रोपे जगवण्याची जबाबदारी निश्चित नसल्याने त्यांचे संवर्धन होत नसल्याचे चित्र आहे. बाळापुरात खड्डेच उरले! शासनाने उद्दिष्ट दिले म्हणून बाळापूर शहरातील विविध शाासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले; मात्र त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी न घेल्याने अनेक वृक्ष सुकली आहेत. पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या वृक्षांना पाणीच देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. नगरपालिका उद्यानात रोपे गायब असून, तेथे पिशव्याच शिल्लक उरल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वृक्षारोपणासाठी खोदलेले खड्डेच शिल्लक आहेत. त्यातील रोपे पाण्याअभावी सुकली आहेत.