शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये अडकले विकासकामांचे नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

संतोष येलकर अकोला : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना उपलब्ध निधीतून विकासकामांचे नियोजन अद्यापही ...

संतोष येलकर

अकोला : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना उपलब्ध निधीतून विकासकामांचे नियोजन अद्यापही करण्यात आलेले नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कामांचे नियोजन अडकल्याने, उपलब्ध दहा कोटी ४१ लाख चार हजार रुपयांचा निधी खर्च होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत चालू आर्थिक वर्षात शासनामार्फत जिल्हा परिषदेला ५२ कोटी पाच लाख २० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून गत ऑगस्टमध्ये जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला निधी वितरित करण्यात आला. त्यामध्ये उपलब्ध निधीतून ८० टक्के निधी (४१ कोटी ६४ लाख १६ हजार रुपये) जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला. तसेच दहा टक्के निधी (पाच कोटी २० लाख ५२ हजार रुपये ) जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना आणि दहा टक्के निधी (पाच कोटी २० लाख ५२ हजार रुपये ) जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आला. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या निधीतून कृती आराखड्यानुसार विकासकामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यातील सात पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आलेल्या निधीतून विकासकामांचे नियोजन अद्यापही करण्यात आलेले नाही. उपलब्ध निधीतून विकासकामांचे नियोजन रखडल्याने, पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या स्तरावर पाच कोटी २० लाख ५२ हजार रुपये आणि जिल्हा परिषदस्तरावर पाच कोटी २० लाख ५२ हजार रुपये असा एकूण दहा कोटी ४१ लाख चार हजार रुपयांचा निधी पडून आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेकडे उपलब्ध निधी केव्हा खर्च होणार आणि विकासकामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असा आहे अखर्चित निधी !

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शी टाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांना वितरित करण्यात आलेला पाच कोटी २० लाख ५२ हजार रुपयांचा निधी आणि जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असलेल्या पाच कोटी २० लाख ५२ हजार रुपयांच्या निधीतून विकासकामांचे नियोजन अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असलेला हा निधी अद्याप अखर्चित आहे.