शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

योजना, अनुदानाचा लाभ मोजक्या शेतक-यांनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:16 IST

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोपप्रसंगी खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली खंत.

अकोला : शासनाच्या योजनांचा लाभ मोजक्या शेतकर्‍यांनाच मिळत असून, कोरडवाहू शेतकरी तथा कापूस उत्पादकांबाबत आजही पक्षपातच केला जातो. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असल्याची खंत खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली. तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ह्यअँग्रोटेक-२0१५ह्णचा समारोप २९ डिसेंबर रोजी करण्यात आला. कृषी विद्यापीठांनी केलेलं मोलाचं संशोधन जोपर्यंत शेतकरीभिमुख होत नाही, तोपर्यंत त्या संशोधनांना अर्थ नाही. याकरिता शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद वाढणे गरजेचे असून, शेतकर्‍यांना कृषी विद्यापीठ आपलंसं वाटावं यासाठीचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन यावेळी खासदार धोत्रे यांनी केले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ह्यअँग्रोटेक-२0१५ह्णचा समारोप २९ डिसेंबर रोजी करण्यात आला. याप्रसंगी खा. धोत्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. अमित झनक, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. किशोर बिडवे, प्रगतिशील शेतकरी नामदेवराव अढाऊ यांची उपस्थिती होती. धोत्रे यांनी कोरडवाहू शेतकर्‍यांची व्यथा मांडताना त्यांच्यावर कसा अन्याय होतो, यासंदर्भातील अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, सर्व योजना व अनुदान ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, अशा मोजक्याच शेतकर्‍यांना देण्यात येत असून, सत्तेत बदल झाला तरी प्रशासकीय यंत्रणा तीच असल्याने कोरडवाहू शेतकर्‍यांप्रति पक्षपात केला जात आहे. सोयाबीनचे दर गेल्या दहा वर्षांत तीन ते चार पटीने वाढले, पण कापसाचे दर कासव गतीने वाढत आहेत. परिणामी विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकर्‍यांनी हे पीक सोडले होते, पंरतु बीटी कापूस आला आणि या बीटीने शेतकर्‍यांचं वाटोळे केले असल्याचे ते म्हणाले. आजमितीस पिकांचे उत्पादन वाढले, पण त्याला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो, परंतु आता अन्नधान्यातील पोषणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, हा धोका ओळखून यापुढे उत्पादन घ्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.