शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

योजना, अनुदानाचा लाभ मोजक्या शेतक-यांनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:16 IST

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोपप्रसंगी खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली खंत.

अकोला : शासनाच्या योजनांचा लाभ मोजक्या शेतकर्‍यांनाच मिळत असून, कोरडवाहू शेतकरी तथा कापूस उत्पादकांबाबत आजही पक्षपातच केला जातो. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असल्याची खंत खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली. तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ह्यअँग्रोटेक-२0१५ह्णचा समारोप २९ डिसेंबर रोजी करण्यात आला. कृषी विद्यापीठांनी केलेलं मोलाचं संशोधन जोपर्यंत शेतकरीभिमुख होत नाही, तोपर्यंत त्या संशोधनांना अर्थ नाही. याकरिता शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद वाढणे गरजेचे असून, शेतकर्‍यांना कृषी विद्यापीठ आपलंसं वाटावं यासाठीचे प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन यावेळी खासदार धोत्रे यांनी केले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ह्यअँग्रोटेक-२0१५ह्णचा समारोप २९ डिसेंबर रोजी करण्यात आला. याप्रसंगी खा. धोत्रे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. अमित झनक, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. किशोर बिडवे, प्रगतिशील शेतकरी नामदेवराव अढाऊ यांची उपस्थिती होती. धोत्रे यांनी कोरडवाहू शेतकर्‍यांची व्यथा मांडताना त्यांच्यावर कसा अन्याय होतो, यासंदर्भातील अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, सर्व योजना व अनुदान ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, अशा मोजक्याच शेतकर्‍यांना देण्यात येत असून, सत्तेत बदल झाला तरी प्रशासकीय यंत्रणा तीच असल्याने कोरडवाहू शेतकर्‍यांप्रति पक्षपात केला जात आहे. सोयाबीनचे दर गेल्या दहा वर्षांत तीन ते चार पटीने वाढले, पण कापसाचे दर कासव गतीने वाढत आहेत. परिणामी विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकर्‍यांनी हे पीक सोडले होते, पंरतु बीटी कापूस आला आणि या बीटीने शेतकर्‍यांचं वाटोळे केले असल्याचे ते म्हणाले. आजमितीस पिकांचे उत्पादन वाढले, पण त्याला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. उत्पादनात आपण स्वयंपूर्ण झालो, परंतु आता अन्नधान्यातील पोषणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, हा धोका ओळखून यापुढे उत्पादन घ्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.