शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाडी आदमपूर-तेल्हारा रस्त्यावर खड्डेच खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST

वाडी आदमपूर : तेल्हारा-वाडी आदमपूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताच्या घटनेत ...

वाडी आदमपूर : तेल्हारा-वाडी आदमपूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच रुपेश राठी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सरपंच रुपेश राठी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेल्हारा-वाडी अदमपूर-उकळीबाजार या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आले; परंतु वाडी अदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा दोन किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच खड्डे बुजवण्यात आले होते, परंतु सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाहून वाडी अदमपूर, इसापूर, उकळी बु, उकळी बाजार ,वरुड वडनेर, वांगरगाव, बाभूळगाव, तळेगाव पा. आदी गावच्या ग्रामस्थांची ये-जा सुरूच राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्डा चुकविताना नियंत्रण सुटल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. (फोटो)

-------------------------------

वाडी आदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

- रूपेश राठी, सरपंच, वाडी आदमपूर.