शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वाडी आदमपूर-तेल्हारा रस्त्यावर खड्डेच खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST

वाडी आदमपूर : तेल्हारा-वाडी आदमपूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताच्या घटनेत ...

वाडी आदमपूर : तेल्हारा-वाडी आदमपूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच रुपेश राठी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सरपंच रुपेश राठी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेल्हारा-वाडी अदमपूर-उकळीबाजार या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आले; परंतु वाडी अदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा दोन किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच खड्डे बुजवण्यात आले होते, परंतु सद्यस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाहून वाडी अदमपूर, इसापूर, उकळी बु, उकळी बाजार ,वरुड वडनेर, वांगरगाव, बाभूळगाव, तळेगाव पा. आदी गावच्या ग्रामस्थांची ये-जा सुरूच राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्डा चुकविताना नियंत्रण सुटल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. (फोटो)

-------------------------------

वाडी आदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

- रूपेश राठी, सरपंच, वाडी आदमपूर.