शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:56 IST

हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली.

हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली. यामुळे हातरुण, मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावातील पाणीपुरवठा एका महिन्यापासून बंद पडलेला आहे. अचानक निर्माण झालेल्या पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार गावांना पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. दुष्काळी परिस्थिती असतांना पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. कारंजा रमजानपूर येथे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बोअरवेल करण्यात आले होते. या बोअरवेल चे पाणी जलकुंभात साठवून प्रत्येक गावात जलवाहिनीद्वारे पोहचण्याची व्यवस्था आहे. मात्र आज रोजी कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेले सहा बोरवेल आटले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. काही बोरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेला होणारा  वीजपुरवठयावर विजेचा लपंडाव होत असल्याने गावागावात पाणी पुरवठा करतांना अडथळा निर्माण होत आहेत. लोनाग्रा, हातरुण, मालवाडा आणि हातला गावात पुलाच्या बांधकामामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुलाचे बांधकाम सुरू असतांना जलवाहिनी कापण्यात आल्याने चार गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला असून या चार गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मालवाडा गावातील नागरिक बोअरवेलचे खारे पाणी पीत असल्याने पोटाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. कारंजा रमजानपूर योजनेच्या ठिकाणापासून ते शिंगोली, मालवाडा, हातरुण, लोनाग्रा आणि हातला अशी नवीन जलवाहिनी मागील वर्षी टाकण्यात आली. कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजने अंतर्गत अकरा बोअरवेल पैकी सहा बोअरवेल आटल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. गावागावात बोअवरवेल करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मालवाडा सरपंच गणेश आढे, लोनाग्रा सरपंच निर्मला सोनोने, सुधाकर बोर्डे, प्रवीण बोर्डे, अक्षय खंडेराव, नीलकंठ कसुरकर, संजय भिलकर, भाजपचे युवा नेते संदीप बोर्डे, गोपाल सोनोने, वैभव दुतोंडे, अमोल चौधरी, गजानन गायकवाड, अंकित खाकरे, शहजाद खान, विशाल ठाकरे, राजेंद्र नसुर्डे, संतोष गव्हाळे, साजिद शाह, शुभम निर्मळ, यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्त सापडेना!

हातरुण आश्रमशाळेसमोर निर्माणाधिन असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापण्यात आली. त्यामुळे चार गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार गावातील हजारो नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. रविवारी भाजप कार्यकर्ता मुकेश गव्हाणकर यांनी मालवाडा ग्रामस्थांची भेट घेऊन पाणीटंचाईची समस्या जाणून घेतली. जनतेला पाणी मिळावे म्हणून पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा करू नका. तात्काळ पाईपालन न जोडल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशारा संवाद ग्रुप चे अध्यक्ष मुकेश गव्हाणकर यांनी दिला आहे.

हातरुण आश्रमशाळेसमोर पुलाचे बांधकाम करीत असतांना पाईपलाईन कापण्यात आली आहे. यामुळे चार गावात एका महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर अद्यापही संबधीत विभागाने उपाययोजना केली नाही.पाणी पुरवठा विभागाने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये.   - गणेश आढे, सरपंच, मालवाडा.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक