शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:56 IST

हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली.

हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली. यामुळे हातरुण, मालवाडा, लोणाग्रा आणि हातला गावातील पाणीपुरवठा एका महिन्यापासून बंद पडलेला आहे. अचानक निर्माण झालेल्या पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच चार गावांना पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. दुष्काळी परिस्थिती असतांना पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. कारंजा रमजानपूर येथे प्रत्येक गावासाठी स्वतंत्र बोअरवेल करण्यात आले होते. या बोअरवेल चे पाणी जलकुंभात साठवून प्रत्येक गावात जलवाहिनीद्वारे पोहचण्याची व्यवस्था आहे. मात्र आज रोजी कारंजा रमजानपुर पाणीपुरवठा योजनेसाठी असलेले सहा बोरवेल आटले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. काही बोरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेला होणारा  वीजपुरवठयावर विजेचा लपंडाव होत असल्याने गावागावात पाणी पुरवठा करतांना अडथळा निर्माण होत आहेत. लोनाग्रा, हातरुण, मालवाडा आणि हातला गावात पुलाच्या बांधकामामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुलाचे बांधकाम सुरू असतांना जलवाहिनी कापण्यात आल्याने चार गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला असून या चार गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मालवाडा गावातील नागरिक बोअरवेलचे खारे पाणी पीत असल्याने पोटाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. कारंजा रमजानपूर योजनेच्या ठिकाणापासून ते शिंगोली, मालवाडा, हातरुण, लोनाग्रा आणि हातला अशी नवीन जलवाहिनी मागील वर्षी टाकण्यात आली. कारंजा रमजानपूर पाणी पुरवठा योजने अंतर्गत अकरा बोअरवेल पैकी सहा बोअरवेल आटल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. गावागावात बोअवरवेल करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मालवाडा सरपंच गणेश आढे, लोनाग्रा सरपंच निर्मला सोनोने, सुधाकर बोर्डे, प्रवीण बोर्डे, अक्षय खंडेराव, नीलकंठ कसुरकर, संजय भिलकर, भाजपचे युवा नेते संदीप बोर्डे, गोपाल सोनोने, वैभव दुतोंडे, अमोल चौधरी, गजानन गायकवाड, अंकित खाकरे, शहजाद खान, विशाल ठाकरे, राजेंद्र नसुर्डे, संतोष गव्हाळे, साजिद शाह, शुभम निर्मळ, यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्त सापडेना!

हातरुण आश्रमशाळेसमोर निर्माणाधिन असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी जलवाहिनी कापण्यात आली. त्यामुळे चार गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार गावातील हजारो नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. रविवारी भाजप कार्यकर्ता मुकेश गव्हाणकर यांनी मालवाडा ग्रामस्थांची भेट घेऊन पाणीटंचाईची समस्या जाणून घेतली. जनतेला पाणी मिळावे म्हणून पाईपलाईन जोडण्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा करू नका. तात्काळ पाईपालन न जोडल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशारा संवाद ग्रुप चे अध्यक्ष मुकेश गव्हाणकर यांनी दिला आहे.

हातरुण आश्रमशाळेसमोर पुलाचे बांधकाम करीत असतांना पाईपलाईन कापण्यात आली आहे. यामुळे चार गावात एका महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर अद्यापही संबधीत विभागाने उपाययोजना केली नाही.पाणी पुरवठा विभागाने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये.   - गणेश आढे, सरपंच, मालवाडा.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक