शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पिंजर-निहिदा रस्त्याचे काम निकृष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

निहिदा: गत तीन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहीदा रस्त्याचे काम सुरू झाले; मात्र अवघ्या काही दिवसातच रस्त्यावरील डांबरीकरण ...

निहिदा: गत तीन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहीदा रस्त्याचे काम सुरू झाले; मात्र अवघ्या काही दिवसातच रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना नाहक त्रासाला समारे जावे लागत आहे. रस्त्याच्या कामाबाबत निहिदा, बहिरखेड, लखमापूर येथील ग्रामस्थांनी तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहिदा रस्त्याचे काम सुरू झाले असून, अद्यापही अपूर्णच आहे. रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने परिसरातील निहिदा, बहिरखेड, लखमापुर येथील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या; मात्र कंत्राटदाराविरुद्ध कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. निकृष्ट काम होत असल्याने परिसरातील रस्त्याचे काम बंद पाडले असून, कंत्राटदाराने काम अपूर्ण करून साहित्य नेल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कामाबाबात कंत्राटदार राहुल सावजी यांना विचारणा केली असता ते अपमानास्पद वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. काम केल्यानंतर काही दिवसातच निहिदा-सावरखेड फाट्यापर्यंत उखडले आहे. गत काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या अनुराधा ठाकरे यांनी तक्रार देऊन विरोध केला होता. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन त्वरित दर्जेदार काम करण्याची मागणी निहिदाचे सरपंच मीना अविनाश ठाकरे, बहिरखेडचे सरपंच कविता किरण ठाकरे, पोलीस पाटील विजय ठाकरे, किरण ठाकरे, संतोष सोनटक्के, मनोज सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

-----------------------

निहिदा- पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल.

-नितीन नाकट, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अकोला

डांबरीकरणाचे निकृष्ट झाल्याचे आरोप होत होते, त्यामुळे सद्या काम बंद आहे. आधी रिपेरिंगचे काम होईल, नंतर डांबरीकरण होईल.

- राहुल सावजी, कंत्राटदार अकोला

निहिदा- पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी दिल्या; मात्र चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे डांबरीकरणाचे काम बंद पाडले आहे.

-मीना अविनाश ठाकरे, सरपंच निहिदा