शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पिकेल ते विकेल संत सावता माळी रयत बाजार अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST

बार्शिटाकळी: शेतकऱ्यांनीच पिकवावं व शेतकऱ्यांनीच विकावं, या धोरणाला चालना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने संत सावता माळी रयत ...

बार्शिटाकळी: शेतकऱ्यांनीच पिकवावं व शेतकऱ्यांनीच विकावं, या धोरणाला चालना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने संत सावता माळी रयत बाजार अभियान अंमलात आणले. बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे आळंदा येथे भाजीपाला विक्रीकरिता शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालय आळंदा फाटा बार्शीटाकळी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली.

शेतकऱ्यांना पंचायत समिती बार्शीटाकळीचे सभापती प्रकाश वाहुरवाघ आणि पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांच्या हस्ते भाजीपाला विक्रीस सावलीकरिता 'छत्री वितरण' करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, कृषी अधिकारी गणेश काळपांडे, कृषी पर्यवेक्षक प्रकाश मनवर, नंदकिशोर बोबडे, सहाय्यक झळके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन गायगोल यांनी केले. याप्रसंगी सभापती प्रकाश वाहुरवाघ यांनी, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढविण्यास होईल, असे सांगत समाधान व्यक्त केले.

फोटो: