शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पाठकोरा कागद व पाठमोरा माणूस वाचता आला पाहिजे

By admin | Updated: September 7, 2014 01:39 IST

अकोला येथे फ.मु. शिंदे यांची सत्काराला उत्तर देताना अपेक्षा, ‘चौफेर कलम’चे प्रकाशन

अकोला : ह्यह्यया जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही, जिभेच्या द्वेषापोटी साखर गोड राहिली नाही..ह्णह्ण अशा सर्मपक ओळीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य फ.मु. शिंदे यांनी सध्याची परिस्थितीत मांडली. आज माणूस हरविला आहे. अशा परिस्थितीत माणसाचा शोध घेताना पाठकोरा कागद व पाठमोरा माणूस वाचता आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी शनिवारी रात्री अकोल्यात व्यक्त केली. नागरी सत्कार व ज्येष्ठ पत्रकार फ.मु. शिंदे यांच्या ह्यचौफेर कलमह्ण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लोककवी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजभाऊ देशमुख उपस्थित होते. पुढे बोलताना, ते म्हणाले प्रतिभेची पूजा एकलव्यासारखी लेखक करीत असतो. तो आपल्या लेखनातून व्यक्त होत असतो. मधु जाधव यांनी आपल्या लेखनातून व्यक्त होऊन समाजाला दिशादर्शक विचार दिले असल्याचे सांगितले. जाधव हे प्रलोभनाचे नाही तर प्रबोधनाचे पत्रकार आहेत, असा गौरवोद्गार शिंदे यांनी जाधव यांच्याबद्दल काढले. त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट त्यांच्या सुप्रसिद्ध ह्यआईह्ण या कवितेने केला. प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी जाधव यांच्या लेखनात कुठला ह्यअभिनयह्ण नाही तर भक्कम अशी ह्यभूमिकाह्ण असल्याचे सांगितले. लेखकात वेड आणि झपाटलेपण आवश्यक आहे आणि ते जाधव यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या परिस्थितीवर ताशेरे ओढ ताना त्यांनी ह्यह्यगावातले बैल गेले लय आके झाले, शिकोरीत नाही लोणी मस्तवाल बोके झालेह्णह्ण असा भाव व्यक्त केला. प्रा. राजाभाऊ देशमुख यांनी मधु जाधव यांचे पुस्तक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकार अशा सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी जाधव यांच्या लेखनाचे कौ तुक केले. आपल्या मनोगतातून मधु जाधव यांनी आपण वाचनाच्या प्रक्रियेतूनच लेखनाकडे वाटचाल केल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. मानपत्र वाचन प्रा. डॉ. ममता इंगोले यांनी केले. यावेळी व्यगंचित्रकार गजानन घोगंडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अशोक ढेरे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उ पस्थित होते.