शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला; तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:19 IST

अकाेला : गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन, शेंगदाणा या खाद्यातेलांसोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. असे असताना ...

अकाेला : गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन, शेंगदाणा या खाद्यातेलांसोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. असे असताना या वाढत्या महागाईच्या विराेधात राजकीय पक्ष रस्त्यावर आले हाेते मात्र त्यांच्या आंदाेलनांची तीव्रता सरकारपर्यंत पाेहचलीच नाही. जाेपर्यंत सामान्य जनता पेटून उठत नाही ताेपर्यंत सरकार लक्ष देणारच नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपसिथत हाेत आहे

पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर आंदोलने तीव्र हाेत असत. आता मात्र विरोधी राजकीय पक्ष किंवा एकही सामाजिक संघटना आपले कर्तव्य म्हणून आंदाेलने करताना दिसतात. दुसरीकडे सरकारच्या संवेदनशीलतेवर जनतेचा विश्वास उडाल्यानेच सामान्य जनता मात्र अशा दरवाढीविराेधात तीव्रतेने बाहेर येणे अपेक्षित असतानाही शांत दिसत आहे. दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे गोरगरीब तथा सर्वसामान्य कुटुंबांमधील गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरानेही उच्चांकी पातळी गाठलेली आहे. यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. असे असताना दरवाढीच्या या प्रश्नावर विरोधी राजकीय पक्षांमधील कुणी पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा सामाजिक संघटनांनी अद्याप आंदोलनाची हाक दिलेली नाही.

दर वाढल्याने बाजारपेठेवर परिणाम

सध्या तूर कापणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकरी शहराच्या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणत आहेत; मात्र डिझेलचे दर वाढल्याने वाहनमालक अधिकचे पैसे मागत आहेत.

पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषिमालाची ने-आण करणारे वाहनचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

काेट

जनतेने राजकीय पक्षांच्या आंदाेलनाकडे पक्षाचा इव्हेंट म्हणून पाहू नये. अशी आंदाेलने ही सर्व जतनेच्या हिताचीच असतात. त्यामुळे राेजचा जगण्याचा संघर्ष टाळायचा असेल तर अशा आंदाेलनात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आवश्यक आहे.

राजेंद्र पाताेडे, प्रवक्ता, वचित बहुजन आघाडी

काेट

जनेतेच्या मनात अशा प्रश्नांवर राग असताेच आणि आताही आहे, मात्र सरकारच्या कार्यक्षमतेवर संशय असल्याने जनता कदाचित मागे हटत असेल, मात्र याेग्य वेळी हा राेष प्रकट हाेताेच. महागाईच्या मुद्यावर तर जनता आक्रमक असतेच.

शिवा माेहाेड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

काेट

जनतेच्या मनातील असंताेष प्रकट करण्यासाठीच राजकीय पक्षांची आंदाेलने हे प्रातिनिधिक आहेत त्याची दखल सरकारला अनेकदा घ्यावी लागली आहे मात्र सध्याचे केंद्र सरकार हे अशा प्रश्नांवर संवेदनशील नाही. केवळ शब्दांचे बुडबुडे अन् आश्वासनाची खैरात हेच काम सरकार करत आहे.

महेश गणगणे, जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस