शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

काेराेना काळात सर्व कामधंदे बंद असल्याने, अनेक जण घरी असल्याने कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून ...

काेराेना काळात सर्व कामधंदे बंद असल्याने, अनेक जण घरी असल्याने कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून घेतला तर काहींच्या कुटुंबामध्ये वाद झाला. जिल्ह्यात एकूण ४३९ तक्रारी या २०२० व मे २०२१ पर्यंत प्राप्त आहेत. यामध्ये पुरुषांच्या महिलांविरुध्द १३ तर महिलांच्या पुरुषांविरुध्द ४२६ तक्रारींचा समावेश आहे. शहरातील अनेक समाजसेवकांनी हे प्रकरण आपसात केले आहे. तर पाेलीस विभागाकडून १३० प्रकरणात सामंजस्य केले असल्याची नाेंद आहे.

सहवास वाढला भांडणेही वाढली!

काेराेना संसर्गामुळे काेणतेही काम नाही. घरात सर्वांशी सहवास वाढला. या सहवासातून घरी बसल्या बसल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद‌्भवणे सुरू झाले. सहवास वाढल्याने भांडणेही वाढल्याचे दिसून येते.

२०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात २७ जणांचे पुन्हा जमले

काेराेना काळात सर्वच जण घरी, त्यातून अनेकांची भांडणे झालीत, तर काहींनी सहवास वाढल्याने आनंदात वेळ घालविला. २०२० व २१ मध्ये महिलांच्या पुरुषांविरुध्द व पुरुषांच्या महिलांविरुध्द एकूण ४४९ तक्रारी प्राप्त झााल्या. यापैकी १३ तक्रारी वगळता सर्व तक्रारी महिलांच्या आहेत. यापैकी महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या साहाय्याने १३० जणांमध्ये सामंजस्य करण्यात आले. यामध्ये २०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात मे महिन्यापर्यंत २७ प्रकरणाचा समावेश आहे. ही १३० कुटुंबे व्यवस्थित जीवन जगत असून पुन्हा याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

भांडणाची ही काय कारणे झाली?

काेराेना काळात अनेक जण घरीच असल्याने सहवास वाढला, यातून विविध खाद्यपदार्थांची फर्माइश वाढली. ती पूर्ण न केल्याने, पत्नी माेबाइलवर जास्त वेळ राहते म्हणून भांडण वाढले. दारू पिऊन येऊन घरात धिंगाणा घातला जात असल्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.

पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी १३

भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी ४३९

महिलांच्या पुरुषांविरुद्ध तक्रारी ४२६