शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील नागरिकांनी ...

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी केले.

मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसोबत ऑनलाईन पद्धतीने बुधवारी जिल्हाधिकारी पापळकर यांनी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, ऑनलाईनव्दारे मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील नागरिकांना भेट देऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनाचे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने घरीच उपचार न घेता तातडीने चाचणी करून रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसेच लग्नप्रसंगाकरीता २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली असून या नियमांचे पालन होत नसल्यास अशांवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता यंत्रणेला निर्देश द्यावेत.

तलाठी, ग्रामसेवक, आशावर्कर्स व कोतवाल या सर्व यंत्रणेंनी ग्रामीण भागात नियमित चाचण्या, संपर्क चाचण्या वाढवून बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ उपचार करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

०००००

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करणार

बालकल्याण समितीकडे दाखल करावे : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला : आई किंवा वडील तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किवा कोरोनाची लागण झाली असल्यास अशा १८ वर्षांखालील बालकांचे तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरुपाचे पुनर्वसन करता येईल. अशा पाल्यांचे अर्ज बाल कल्याण समितीकडे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून कोविड संसर्गामुळे पालकांना विलगीकरण किवा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केल्यामुळे बालकांच्या पालनपोषणाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच बालकांचे दोन्ही पालक मृत्यू झालेले आहेत अशा बालकांना बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत पालनपोषण व संरक्षण करण्यात येते.

जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळून आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांनी बालकांचे शुभचिंतक या नात्याने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.