शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील नागरिकांनी ...

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी केले.

मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसोबत ऑनलाईन पद्धतीने बुधवारी जिल्हाधिकारी पापळकर यांनी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, ऑनलाईनव्दारे मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील नागरिकांना भेट देऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनाचे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने घरीच उपचार न घेता तातडीने चाचणी करून रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसेच लग्नप्रसंगाकरीता २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली असून या नियमांचे पालन होत नसल्यास अशांवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता यंत्रणेला निर्देश द्यावेत.

तलाठी, ग्रामसेवक, आशावर्कर्स व कोतवाल या सर्व यंत्रणेंनी ग्रामीण भागात नियमित चाचण्या, संपर्क चाचण्या वाढवून बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ उपचार करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

०००००

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करणार

बालकल्याण समितीकडे दाखल करावे : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला : आई किंवा वडील तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किवा कोरोनाची लागण झाली असल्यास अशा १८ वर्षांखालील बालकांचे तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरुपाचे पुनर्वसन करता येईल. अशा पाल्यांचे अर्ज बाल कल्याण समितीकडे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून कोविड संसर्गामुळे पालकांना विलगीकरण किवा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केल्यामुळे बालकांच्या पालनपोषणाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच बालकांचे दोन्ही पालक मृत्यू झालेले आहेत अशा बालकांना बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत पालनपोषण व संरक्षण करण्यात येते.

जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळून आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांनी बालकांचे शुभचिंतक या नात्याने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.