शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांनी काढला सरपंचाच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: June 24, 2017 05:54 IST

धामणा गावात सहा महिन्यांपासून पाणीटंचाई.

बोरगाव वैराळे: अकोला तहसील अंतर्गत येत असलेल्या धामणा गावात मागील सहा महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ गावालगतच्या पूर्णा नदीवरून पिण्यासाठी पाणी आणत होते; मात्र आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पूर्णा नदीत जाणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे आता पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. याला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी सरपंच चंद्रकला सावंग यांच्या घरावर मोर्चा काढून पिण्यासाठी नळ योजनेचे पाणी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.धामणा व नवीन धामणा गावाला खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा केल्या जातो. गेल्या सहा महिन्यांपासून या गावात पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइनवर लिकेज असल्यामुळे पिण्याचे पाणी पोहचले नाही. या पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थ पिण्यासाठी पूर्णा नदीच्या पात्रातून पाणी आणत होते; मात्र पहिल्याच पावसात पूर्णा नदीपात्रात उंच कड्यावरून उतरणारा रस्ता वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी जीव धोक्यात घालून पूर्णा नदीचे पाणी आणावे लागत आहे. पूर्णा नदीचे पाणी आणताना भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीची दखल घेऊन धामणा येथील ग्रामस्थांनी सरपंच चंद्रकला सावंग यांच्या घरावर मोर्चा काढून तत्काळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावात पोहचविण्यासाठी साकडे घातले.