शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लोकाभिमुख-पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न!

By admin | Updated: April 26, 2017 02:12 IST

आस्तिककुमार पांडेय यांची ग्वाही : जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली!

अकोला : जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिली. मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनामार्फत गत शनिवारी करण्यात आल्या. त्यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणून जळगाव खान्देशचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पांडेय मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले. मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून आस्तिककुमार पांडे यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. विकासाच्या दृष्टीने अकोला जिल्ह्याचा लौकिक आणि वैभवात भर टाकण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असेही जिल्हाधिकारी पांडेय यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी, त्यानंतर १४ जानेवारी २०१५ पासून जळगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले.जी. श्रीकांत कार्यमुक्त; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिला निरोप!नांदेड येथे बदली झाल्याने मावळते जिल्हाधिकारी जी.श्रीकांत मंगळवारी अकोला येथून कार्यमुक्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनस्थित छत्रपती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रशासनामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने जी.श्रीकांत यांना निरोप देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात जी.श्रीकांत यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.जी. श्रीकांत यांच्या उपक्रमांना ऊर्जा देणार- पांडेय जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जी.श्रीकांत यांना जिल्हावासीयांचे जसे प्रेम मिळाले, तसेच प्रेम आणि सहकार्य मला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असून, सकारात्मक दृष्टीने या उपक्रमांना नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्ट केले.अकोलेकरांचे प्रेम विसरणार नाही - जी. श्रीकांतजिल्हाधिकारी म्हणून काम करताना गत दोन वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्हावासीयांनी दिलेले प्रेम विसरता येणार नाही. मला जे जिल्हावासीयांचे प्रेम मिळाले, त्यापेक्षा दुपटीने नवे जिल्हाधिकारी पांडेय यांना जिल्हावासीयांचे प्रेम मिळेल, प्रशासन अधिकाधिक गतिमान आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केली.