शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

टाळेबंदी काळात जनता आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ...

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. दुसऱ्या कोविड लाटेच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना आपल्या संसाराचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतमजुरांच्या हातालाही काम नाही.

विविध उद्योग व कारखाने बंद असल्याने तरुणांच्याही हाताला काम नाही. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शिक्षण पूर्ण कसे होईल, या विवंचनेत विद्यार्थी सापडले आहेत तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळेल, या आशेवर असलेले तरूण नोकर भरती बंद असल्याने हताश झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील छोटे व्यापारी, दुकानदार हे टाळेबंदी काळात व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत तर अनेकांची दुकाने ही भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे दुकानाचे दर महिन्याचे भाडे, वीजबिल यांची आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य माणूस घरखर्चामुळे कमालीचा धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

गरीब जनतेसाठी शासनाने पॅकेज द्यावे!

निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यातच तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतमजूर व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तरुणांना सुशिक्षित रोजगार भत्ता द्यावा, छोट्या व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे, बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच पदवीप्राप्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फी माफ करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.