शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदी काळात जनता आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ...

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. दुसऱ्या कोविड लाटेच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना आपल्या संसाराचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतमजुरांच्या हातालाही काम नाही.

विविध उद्योग व कारखाने बंद असल्याने तरुणांच्याही हाताला काम नाही. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शिक्षण पूर्ण कसे होईल, या विवंचनेत विद्यार्थी सापडले आहेत तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळेल, या आशेवर असलेले तरूण नोकर भरती बंद असल्याने हताश झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील छोटे व्यापारी, दुकानदार हे टाळेबंदी काळात व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत तर अनेकांची दुकाने ही भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे दुकानाचे दर महिन्याचे भाडे, वीजबिल यांची आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य माणूस घरखर्चामुळे कमालीचा धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

गरीब जनतेसाठी शासनाने पॅकेज द्यावे!

निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यातच तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतमजूर व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तरुणांना सुशिक्षित रोजगार भत्ता द्यावा, छोट्या व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे, बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच पदवीप्राप्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फी माफ करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.