शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

टाळेबंदी काळात जनता आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ...

बोरगाव मंजू : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. दुसऱ्या कोविड लाटेच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना आपल्या संसाराचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतमजुरांच्या हातालाही काम नाही.

विविध उद्योग व कारखाने बंद असल्याने तरुणांच्याही हाताला काम नाही. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शिक्षण पूर्ण कसे होईल, या विवंचनेत विद्यार्थी सापडले आहेत तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळेल, या आशेवर असलेले तरूण नोकर भरती बंद असल्याने हताश झाले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील छोटे व्यापारी, दुकानदार हे टाळेबंदी काळात व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत तर अनेकांची दुकाने ही भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे दुकानाचे दर महिन्याचे भाडे, वीजबिल यांची आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य माणूस घरखर्चामुळे कमालीचा धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

गरीब जनतेसाठी शासनाने पॅकेज द्यावे!

निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यातच तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतमजूर व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तरुणांना सुशिक्षित रोजगार भत्ता द्यावा, छोट्या व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे, बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच पदवीप्राप्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फी माफ करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.