शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

राज्यातील शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल झाले ‘हँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:11 IST

गत दोन-तीन दिवसांपासून उमेदवारांचे अर्ज, पवित्र पोर्टल ‘हँग’ होत असल्याने फेटाळले जात आहे.

- संजय खांडेकरअकोला : महाराष्ट्र राज्य शासनाने दीर्घ प्रतीक्षेनंतर माध्यमिक आणि प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची भरती सुरू केली. केंद्रीय पद्धतीने सुरू झालेल्या या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज स्वीकृतीसाठी ३१ मे ही अंतिम तारीख ठेवण्यात आली असली तरी गत दोन-तीन दिवसांपासून उमेदवारांचे अर्ज, पवित्र पोर्टल ‘हँग’ होत असल्याने फेटाळले जात आहे. त्यामुळे हजारो उमेदवार त्रासले असून, अर्ज स्वीकृतीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.भाजप सत्तेवर आल्यानंतर शासकीय आणि खासगी शिक्षक भरतीवर प्रतिबंध घातला गेला. त्यामुळे राज्यातील अनेक डी.एड. आणि बी.एड. महाविद्यालये बंद पडली; मात्र डीएड-बीएड झालेले हजारो उमेदवार याआधीच बेरोजगार म्हणून फि रत आहेत. शिक्षक झालेल्या या बेरोजगारीची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने टीईटी परीक्षा घेतली होती. टीईटी उत्तीर्ण झालेले उमेदवार आता पवित्र पोर्टलवर अर्ज करण्यास पात्र ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्याच्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली; मात्र पवित्र पोर्टलवरील प्रीफरन्स लिस्ट दिसत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पवित्र पोर्टलवर अर्ज करण्यासाठी हजारो शिक्षक दररोज सायबर कॅफेचे उंबरठे झिजवित आहेत; मात्र त्यांना यश आलेले नाही. गत तीन दिवसांपासून सुरू पवित्र पोर्टल हँग होत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पोर्टलच्या क्षमतेसह अर्ज स्वीकृतीची तारीख राज्य शासनाने वाढवावी, अशी मागणी हजारो उमेदवारांनी केली आहे.- दररोज दहा ते पंधरा शिक्षक पवित्र पोर्टलवर अर्ज करण्यासाठी येत आहेत. मध्येच पोर्टल हँग होते, फार्म अपलोड होत नाही. प्रीफरन्स लिस्ट उघडत नाही. उघडली तर पूर्ण यादी येत नाही. या समस्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे उमेदवार कमालीचे त्रासले आहेत.-अनिल मानकर, सायबर कॅफे संचालक, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती