शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पातूरच्या युवकांनी वाचविले तिघांचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST

मागील दोन आठवड्यांत शुभम नामक युवकाचा व दाते नामक महिला धबधब्याजवळील डोहात बुडत असताना, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, ...

मागील दोन आठवड्यांत शुभम नामक युवकाचा व दाते नामक महिला धबधब्याजवळील डोहात बुडत असताना, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, रणजित गाडेकर नामक युवकाने डोहात उडी घेऊन दोघांचे प्राण वाचविले.

पातूर घाटाच्या सान्निध्यात वसलेल्या धोदानी पर्यटन परिसरात असलेल्या धबधब्याजवळील डोहात काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी एक तरुण बुडत होता. परंतु तेथील उपस्थित मित्रांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचवेळी बाजूला झाडाखाली बसलेल्या गौरव सुरेश श्रीनाथ याने क्षणाचाही विलंब न करता, हवेने भरलेले ट्यूब त्याच्याकडे फेकले. परंतु या युवकाला ट्यूब पकडता आले नाही. त्यामुळे गौरवने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेऊन त्या युवकाचे प्राण वाचविले. मागील आठवड्यात धोदानी येथे अकोला येथील दाते परिवार आला होता. त्या परिवारातील एका महिलेचा पाय घसरून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून धबधब्याजवळील खोल पाण्यामध्ये पडली. यावेळी युवक रणजित गाडेकर याने पाण्यामध्ये उडी घेऊन महिलेला पाण्याच्या बाहेर काढले. अकोला येथील रहिवासी शुभम नावाचा मुलगा घसरून पडल्याने त्याचे सुद्धा प्राण रणजित गाडेकर यांनी वाचविले.

पर्यटन करा, पण जरा जपून!

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पातूरच्या जंगलासह डोंगरांचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. धोदानी धबधबासुद्धा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धोदानी धबधब्याजवळ डोह असल्याने, अनेकांना पाण्यामध्ये उतरण्याचा मोह आवरत नाही. परंतु अनेकांना यात जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे धोदानी धबधब्यावर येताना, पर्यटकांनी खबरदारी घ्यावी.