शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पॅसेंजर होणार एक्स्प्रेसमध्ये परावर्तित; जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच गाड्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या ...

अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. विशेष गाड्यांच्या जादा भाड्याने सामान्य प्रवासी मेटाकुटीला आलेला असतानाच आता २०० किमीपेक्षा अधिक अंतर कापणाऱ्या व तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याची माहिती आहे. पॅसेंजर गाड्या कायमच्या बंद झाल्या तर सामान्य प्रवाशांनी प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर

मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला येथून पाच पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. कोरोना काळात या पॅसेंजर गाड्या बंद झाल्यापासून नजीकचा प्रवास करणाऱ्यांची गाेची होत आहे. जवळच्या स्थानकासाठीही महागडे तिकीट ते देखील ऑनलाइन आरक्षण करून काढावे लागते. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित झाल्या तर सामान्य प्रवाशांना रेल्वेची दारेच बंद होतील, अशी भावना जनसामान्यात आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या

गाडी क्रमांक गाडी नाव सध्या सुरू की बंद

५११८३ भुसावळ-नरखेड बंद ५११९८ वर्धा-भुसावळ बंद

५१२८६ नागपूर-भुसावळ बंद

५७५८१ अकोला-पूर्णा बंद

५७५३९ अकोला-परळी बंद

पॅसेंजर गाड्यांचे भवितव्य अनिश्चित

कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नसून, त्या कधी सुरू होतील याबाबत रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांनाही माहिती नाही. राज्य सरकार निर्णय घेईल तेव्हाच पॅसेंजर गाड्या सुरू होऊ शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित होण्याबाबतचा निर्णय जुना असला तरी पॅसेंजर गाड्याच सुरू नसल्यामुळे याबाबत सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना एक्स्प्रेस कशी परवडणार?

पॅसेंजर गाड्यांचे तिकीट कमी असते व त्या जवळपास सर्वच स्थानकांवर थांबतात, त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी त्या सोयीस्कर आहेत. दोन वर्षांपासून बंद असलेल्या या गाड्या आता एक्स्प्रेसमध्ये परावर्तित झाल्या तर सामान्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्नच आहे.

- नारायणराव गोतमारे, एक प्रवासी

विशेष गाड्यांचे तिकीट महाग आहे व त्या जवळच्या स्थानकांवर थांबतही नाहीत. अशा परिस्थितीत पॅसेंजर गाड्या सुरू होणे गरजेचे आहे. सरकारने सामान्यांसाठी असलेल्या पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करू नये, अशी अपेक्षा आहे.

- रमेश बारस्कार, एक प्रवासी