शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पॅसेंजर होणार एक्स्प्रेसमध्ये परावर्तित; जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच गाड्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या ...

अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. विशेष गाड्यांच्या जादा भाड्याने सामान्य प्रवासी मेटाकुटीला आलेला असतानाच आता २०० किमीपेक्षा अधिक अंतर कापणाऱ्या व तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याची माहिती आहे. पॅसेंजर गाड्या कायमच्या बंद झाल्या तर सामान्य प्रवाशांनी प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर

मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला येथून पाच पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. कोरोना काळात या पॅसेंजर गाड्या बंद झाल्यापासून नजीकचा प्रवास करणाऱ्यांची गाेची होत आहे. जवळच्या स्थानकासाठीही महागडे तिकीट ते देखील ऑनलाइन आरक्षण करून काढावे लागते. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित झाल्या तर सामान्य प्रवाशांना रेल्वेची दारेच बंद होतील, अशी भावना जनसामान्यात आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या

गाडी क्रमांक गाडी नाव सध्या सुरू की बंद

५११८३ भुसावळ-नरखेड बंद ५११९८ वर्धा-भुसावळ बंद

५१२८६ नागपूर-भुसावळ बंद

५७५८१ अकोला-पूर्णा बंद

५७५३९ अकोला-परळी बंद

पॅसेंजर गाड्यांचे भवितव्य अनिश्चित

कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नसून, त्या कधी सुरू होतील याबाबत रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांनाही माहिती नाही. राज्य सरकार निर्णय घेईल तेव्हाच पॅसेंजर गाड्या सुरू होऊ शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित होण्याबाबतचा निर्णय जुना असला तरी पॅसेंजर गाड्याच सुरू नसल्यामुळे याबाबत सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना एक्स्प्रेस कशी परवडणार?

पॅसेंजर गाड्यांचे तिकीट कमी असते व त्या जवळपास सर्वच स्थानकांवर थांबतात, त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी त्या सोयीस्कर आहेत. दोन वर्षांपासून बंद असलेल्या या गाड्या आता एक्स्प्रेसमध्ये परावर्तित झाल्या तर सामान्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्नच आहे.

- नारायणराव गोतमारे, एक प्रवासी

विशेष गाड्यांचे तिकीट महाग आहे व त्या जवळच्या स्थानकांवर थांबतही नाहीत. अशा परिस्थितीत पॅसेंजर गाड्या सुरू होणे गरजेचे आहे. सरकारने सामान्यांसाठी असलेल्या पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करू नये, अशी अपेक्षा आहे.

- रमेश बारस्कार, एक प्रवासी