शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पॅसेंजर होणार एक्स्प्रेसमध्ये परावर्तित; जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच गाड्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या ...

अकोला : रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाहीत. विशेष गाड्यांच्या जादा भाड्याने सामान्य प्रवासी मेटाकुटीला आलेला असतानाच आता २०० किमीपेक्षा अधिक अंतर कापणाऱ्या व तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याची माहिती आहे. पॅसेंजर गाड्या कायमच्या बंद झाल्या तर सामान्य प्रवाशांनी प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर

मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोला येथून पाच पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. कोरोना काळात या पॅसेंजर गाड्या बंद झाल्यापासून नजीकचा प्रवास करणाऱ्यांची गाेची होत आहे. जवळच्या स्थानकासाठीही महागडे तिकीट ते देखील ऑनलाइन आरक्षण करून काढावे लागते. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित झाल्या तर सामान्य प्रवाशांना रेल्वेची दारेच बंद होतील, अशी भावना जनसामान्यात आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या

गाडी क्रमांक गाडी नाव सध्या सुरू की बंद

५११८३ भुसावळ-नरखेड बंद ५११९८ वर्धा-भुसावळ बंद

५१२८६ नागपूर-भुसावळ बंद

५७५८१ अकोला-पूर्णा बंद

५७५३९ अकोला-परळी बंद

पॅसेंजर गाड्यांचे भवितव्य अनिश्चित

कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नसून, त्या कधी सुरू होतील याबाबत रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांनाही माहिती नाही. राज्य सरकार निर्णय घेईल तेव्हाच पॅसेंजर गाड्या सुरू होऊ शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित होण्याबाबतचा निर्णय जुना असला तरी पॅसेंजर गाड्याच सुरू नसल्यामुळे याबाबत सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना एक्स्प्रेस कशी परवडणार?

पॅसेंजर गाड्यांचे तिकीट कमी असते व त्या जवळपास सर्वच स्थानकांवर थांबतात, त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी त्या सोयीस्कर आहेत. दोन वर्षांपासून बंद असलेल्या या गाड्या आता एक्स्प्रेसमध्ये परावर्तित झाल्या तर सामान्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्नच आहे.

- नारायणराव गोतमारे, एक प्रवासी

विशेष गाड्यांचे तिकीट महाग आहे व त्या जवळच्या स्थानकांवर थांबतही नाहीत. अशा परिस्थितीत पॅसेंजर गाड्या सुरू होणे गरजेचे आहे. सरकारने सामान्यांसाठी असलेल्या पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करू नये, अशी अपेक्षा आहे.

- रमेश बारस्कार, एक प्रवासी