शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

वैद्यकीय प्रवेश घेताना पालक, विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी!

By admin | Updated: June 5, 2017 02:05 IST

प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर: प्रवीण शिनगारे यांचे मार्गदर्शन, विद्यार्थी पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नीट परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरावे लागणार आहेत. कॉलेज कोड टाकताना १ ते ९ पर्यंंतचे डिजिट विचारपूर्वक आणि लक्षपूर्वक भरावे. डिजिटमधील एकही आकडा चुकला तर एमबीबीएस प्रवेशापासून तुम्ही मुकला. मेहनत करूनही तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अत्यंत दक्ष राहून स्वत:च्या आत्मविश्‍वासाच्या भरवशावर न राहता घरातील चार व्यक्तींना तरी भरलेला अर्ज दाखवावा, अशा शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी येथे मार्गदर्शन केले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी प्रमिलाताई ओक सभागृहात नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात ते बोलत होते. विद्यार्थी व पालकांनी वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. अपर्णा पाटील, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले. डॉ. शिनगारे यांनी राज्यातील १ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली असून, राज्यात ७५00 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे, असे सांगत शिनगारे म्हणाले, की राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उत्कृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी सर्वच महाविद्यालयांना पसंती द्यावी; परंतु प्रवेश अर्ज भरताना एकदाच पक्का निर्णय घ्या, अर्ज भरताना खाडाखोड करू नका, पर्याय निवडताना अनेकजण जवळचे वैद्यकीय महाविद्यालय निवडतात; परंतु पालक व विद्यार्थ्यांंंनी प्रथम मुंबई, नागपूरचा विचार करावा. अर्ज भरताना सामूहिक निर्णय घ्या, कॉलेज कोडचे फोर डिजिट, कॉलेजला प्राधान्य देताना अर्ज लक्षपूर्वक भरा, डिजिटमधील एकही आकडा चुकला तर एमबीबीएस प्रवेशापासून तुम्ही मुकले असे समजा, असा सल्लाही डॉ. शिनगारे यांनी दिला. वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा, शुल्क याची माहिती घ्या. प्रवेश कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात मिळतो आहे, याला महत्त्व न देता प्रवेशाला महत्त्व द्यावे. माझ्या मते, ज्या कॉलेजमध्ये पदव्युत्तर जागा जास्त आहेत, ते कॉलेज चांगले, अशा शब्दांत शिनगारे यांनी मार्गदर्शन केले.