शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

पंदेकृवि : अखेर उपोषणाची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:48 IST

अकोला : ‘समान काम समान वेतन’ मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्‍यांनी मागील पावणे दोन महिन्यांपासून पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन व उपोषण अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले.  राहणीमान भत्ता फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देऊन,समान वेतनाची मागणी शासन दरबारी रेटण्याचे आश्‍वासन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कर्मचार्‍यांना देण्यात आले. 

ठळक मुद्देकर्मचार्‍यांचे दोन महिने उपोषणराहणीमान भत्त्याची रक्कम मिळणार!

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ‘समान काम समान वेतन’ मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्‍यांनी मागील पावणे दोन महिन्यांपासून पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन व उपोषण अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले.  राहणीमान भत्ता फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देऊन,समान वेतनाची मागणी शासन दरबारी रेटण्याचे आश्‍वासन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कर्मचार्‍यांना देण्यात आले.  खरीप हंगाम पूर्ण हातातून गेला आहे. आता रब्बी हंगामाचे दिवस आल्याने संपावर तोडगा काढण्यासाठीचे कृषी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू  होते.पावणे दोन महिन्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून,कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर  ६ ऑक्टोबर रोजी कर्मचार्‍यांनी आंदोलन व उपोषण मागे घेतले. यासाठी कुलगुरू  डॉ.विलास भाले यांनी कर्मचार्‍यांची बाजू समजून घेतली होती व त्यांना राहणीमान भत्त्यांची रक्कम  दिवाळीपूर्वी देण्याचे आश्‍वासन दिले होते, तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी.एम.मानकर यांनीसुद्धा उपोषण मागे घेण्याकरिता कर्मचार्‍यांशी चर्चा केली होती. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सदर आंदोलन करण्यात आल्याने विद्यापीठाचे विविध प्रक्षेत्रावरील संशोधनात्मक कार्यावर तसेच बीजोत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. दरम्यान, कामगार संघटना प्रतिनिधी राजेश मुरुमकार, गौतम थोरात, प्रकाश सदांशिव यांनी विद्यापीठ प्रशासनास उपोषण मागे घेत असल्याचे लेखी कळवीत मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. कुलसचिवांच्याहस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू-पाणी पाजून उपोषणाची सांगता झाली. यावेळी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी संजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके, बोदडे व इतरांनी सहकार्य केले, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते व त्यांच्या चमूने उपोषणकर्त्यांची वेळोवेळी तपासणी केली.

संपामुळे पिकांचे झाले नुकसान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जवळपास ५ हजार एकर क्षेत्र असून, यातील साडेतीन हजार हेक्टरवर पिके घेतली जातात, शेतकर्‍यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे उपलब्ध करू न देण्यासाठी  या प्रक्षेत्रावर विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते;खरीप पिकांचा हंगाम सुरू  असताना कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू  केल्याने कृषी विद्यापीठातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मूग,उडीद तसेच सोयाबीन पीक हातचे गेले असून, कापूस व तुरीचे पीकही गुरांनी फस्त करणे लावले आहे.