शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

अकोला जिल्ह्यात घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे सुरु !

By संतोष येलकर | Updated: July 20, 2023 17:47 IST

पाऊस अन् पुराचा तडाखा : शेकडो घरांची पडझड; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अकोला: जिल्हयात मंगळवारी रात्री बसरलेला जोरदार पाऊस आणि नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात शेकडो घरांची पडझड झाली असून, हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून सुरु करण्यात आले.जिल्हयातील सातही तालुक्यात १८ जुलै रोजी रात्रभर जोरदार पाऊस बरसला असून, तेल्हारा तालुक्यासह आठ महसूल मंडळांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. धो धो पाऊस आणि त्यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात जिल्हयातील विविध भागात शेकडो घरांचे नुकसान झाले.

नदी नाल्याकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी घरांत घुसल्याने अनेक घरांतील साहित्याचे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी शेकडो हेक्टर शेतजमीन पिकांसह खरडून गेली असून, पाण्यात बुडालेल्या हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस व पुराच्या तडाख्यात घरांचे पूर्णत: नुकसान झालेल्या बाधीत कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक इत्यादींच्या पथकांव्दारे सुरु करण्यात आले.

४५ घरांचे पूर्णत: २१० घरांचे अंशत: नुकसान !

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार पाऊस आणि पुरामुळे जिल्हयातील मूर्तिजापूर तालुक्यात ४५ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, २१० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यासोबतच जिल्हयातील विविध भागातही घरांची पडझड झाली आहे.

खरडून गेलेली जमीन; पीक नुकसानीचा असा आहे प्राथमिक अंदाज !

पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील विविध भागात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्हयातील मूर्तिजापूर , बार्शिटाकळी व अकोला या तीन तालुक्यांत ५१५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून, १४ हजार २९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यात ८ हजार २९० हेक्टर, बार्शिटाकळी तालुक्यात २ हजार ६० हेक्टर आणि अकोला तालुक्यात ३ हजार ९४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पंचनाम्यांत समोर येणार नुकसानीचे वास्तव !

नुकसान झालेल्या घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले आहे. पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हयातील घरांच्या नुकसानीसह पीक नुकसानीचे वास्तव समोर येणार आहे.