शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अकोला जिल्ह्यात घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे सुरु !

By संतोष येलकर | Updated: July 20, 2023 17:47 IST

पाऊस अन् पुराचा तडाखा : शेकडो घरांची पडझड; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अकोला: जिल्हयात मंगळवारी रात्री बसरलेला जोरदार पाऊस आणि नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात शेकडो घरांची पडझड झाली असून, हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून सुरु करण्यात आले.जिल्हयातील सातही तालुक्यात १८ जुलै रोजी रात्रभर जोरदार पाऊस बरसला असून, तेल्हारा तालुक्यासह आठ महसूल मंडळांच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. धो धो पाऊस आणि त्यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यात जिल्हयातील विविध भागात शेकडो घरांचे नुकसान झाले.

नदी नाल्याकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी घरांत घुसल्याने अनेक घरांतील साहित्याचे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी शेकडो हेक्टर शेतजमीन पिकांसह खरडून गेली असून, पाण्यात बुडालेल्या हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस व पुराच्या तडाख्यात घरांचे पूर्णत: नुकसान झालेल्या बाधीत कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक इत्यादींच्या पथकांव्दारे सुरु करण्यात आले.

४५ घरांचे पूर्णत: २१० घरांचे अंशत: नुकसान !

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार पाऊस आणि पुरामुळे जिल्हयातील मूर्तिजापूर तालुक्यात ४५ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, २१० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यासोबतच जिल्हयातील विविध भागातही घरांची पडझड झाली आहे.

खरडून गेलेली जमीन; पीक नुकसानीचा असा आहे प्राथमिक अंदाज !

पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयातील विविध भागात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्हयातील मूर्तिजापूर , बार्शिटाकळी व अकोला या तीन तालुक्यांत ५१५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून, १४ हजार २९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यात ८ हजार २९० हेक्टर, बार्शिटाकळी तालुक्यात २ हजार ६० हेक्टर आणि अकोला तालुक्यात ३ हजार ९४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पंचनाम्यांत समोर येणार नुकसानीचे वास्तव !

नुकसान झालेल्या घरांसह पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले आहे. पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हयातील घरांच्या नुकसानीसह पीक नुकसानीचे वास्तव समोर येणार आहे.