शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अकोट तालुक्यात पाणंद रस्ते चिखलमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST

शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी ...

शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते; मात्र दीर्घ कालावधीनंतरही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. चिखलमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले. निजामपूर-टाकळी बु. परिसरातील शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे. निजामपूर येथे शेतात बैल गाडीत खते घेऊन जाताना चिखलात बैल गाडी फसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे. पाणंद रस्ते चिखलमुक्त करण्यासाठी शासनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरवावा, पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद नसल्याने निजामपूर येथील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

-----------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून निजामपूर-टाकळी बु. शेतरस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून गावातील नागरिक प्रशासन लोकप्रतिनिधींना वारंवार सांगून सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांचे या दुर्लक्षामुळे सकाळी एक शेतकरी बैल गाडीने शेतात खते घेऊन जात असताना चिखलमय शेतरस्त्यात फसली. शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला, तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन समस्या दूर करावी.

- प्रमोद की. बगाडे, शेतकरी, निजामपूर.