शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लसीकरणाची कासवगती; दररोज गरज १५ हजार डोसची, मिळतात केवळ तीन हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST

१० शहरांत केवळ ९ केंद्रे सुरू कोविड लसीकरण मोठ्या उत्साहात सुरू असले, तरी लसीअभावी जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंंद्रे बंद ...

१० शहरांत केवळ ९ केंद्रे सुरू

कोविड लसीकरण मोठ्या उत्साहात सुरू असले, तरी लसीअभावी जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंंद्रे बंद आहेत. महापालिका क्षेत्रात ९ केंद्रे सुरू असले, तरी त्यापैकी बहुतांश केंद्रांवर ४५ वर्षांखालील लाभार्थींनाच लस उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या लाभार्थींनाच लस उपलब्ध हाेत आहे. मात्र, ते देखील मोजक्याच लाभार्थींना मिळत आहेे.

आतापर्यंतचे लसीकरण - २,३१,४९२

पहिला डोस - १,८९,१२४

दुसरा डोस - ४२,३६८

एकूण रुग्ण - ४६,२७६

कोरोनामुक्त -३९०१२

लसीकरण

ज्येष्ठ नागरिक

४५ ते ६० वयोगट - ८९,४४०

१८ ते ४५ वयोगट -२९,५४६

नागरिक वैतागले

कोविड लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, मात्र लस बुकिंगचा प्रयत्न विफल ठरत आहे. दररोज बुकिंगचा प्रयत्न करूनही लस मिळत नसल्याने हताश झालो आहे.

- विशाल वंजारे, युवक

लसीकरणाच्या बुकिंगसाठी दररोज ५ वाजताच्या सुमारास लॉगइन करतो. लस बुकिंग सुरू होताच १० सेकंदांत केंद्रच बुक झाल्याचे दाखवते. नेमकं चाललं काय, हेच कळत नाही.

- सचिन पडोळे, युवक

मोजकीच लसीकरण केंद्रे आणि लसीचे अत्यल्प डोस यामुळे लस मिळत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण केंद्रे वाढवावी, जेणेकरून लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळणे शक्य होईल व जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण होईल.

- विलास पाटील, युवक

४५ वर्षांआतील लाभार्थींसाठी पाच केंद्र

महापालिका क्षेत्रात नऊ लसीकरण केंद्र सुरू असून, यापैकी पाच केंद्रे हे ४५ वर्षांआतील लाभार्थींसाठी खुली असणार आहे. यामध्ये जीएमसी, कस्तुरबा गांधी रुग्णालय, कृषीनगर नागरी आरोग्य केंद्र, आरकेटी कॉलेज, सिंधी कॅम्प नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. तसेच उर्वरित भरतीय रुग्णालय, हरिहरपेठ नागरी आरोग्य केंद्र, आरकेटी रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आदी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लाभार्थींचे लसीकरण होणार आहे.

लसीकरण ९ पासून लाइन सकाळी ६ वाजतापासूनच

शहरातील लसीकरण केंद्रांवर सकाळी ९ वाजता लसीकरणास सुरुवात हाेते, मात्र लवकर लस मिळावी म्हणून लाभार्थी सकाळी ६ वाजतापासूनच लसीकरण केंद्राबाहेर लांबलचक रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येते. या प्रकारामुळे कोरोना संसर्गाच्या फैलावाचीही दाट शक्यता आहे.