शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तालुक्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST

याेग दिनानिमित्त शिबिरांचे आयाेजन अकाेला: दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी ...

याेग दिनानिमित्त शिबिरांचे आयाेजन

अकाेला: दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी योग दिनाचे औचित्य साधत जिल्हाभरात विविध ठिकाणी योग शिबिरांचे आयाेजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमांचे आयाेजन केले जात असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली.

रस्त्यावर सडका भाजीपाला

अकोला : शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या जठारपेठ चाैकात भाजीपाला विक्रेते सडका भाजीपाला रस्त्यालगत फेकत असल्याचे चित्र आहे़

याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष हाेत असून साफसफाई अभावी परिसरात प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

पाेळा चाैकात अवैध नळ जोडणी

अकोला : शहराच्या विविध भागात अवैधरीत्या नळ जोडणी घेण्यात आली आहे. जुने शहरातील पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळ जाेडणी घेऊन त्या माध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.

पंढरपुरच्या वारीसाठी परवानगी द्या !

अकोला : महाराष्ट्रातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी परवानगी देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा यांनी केली आहे़ २० जुलै राेजी आषाढी एकादशी असून त्यानिमित्ताने वारकऱ्यांना काेराेना नियमांचे पालन करुन वारीसाठी परवानगी देण्याची मागणी आ़ शर्मा यांनी शासनाकडे केली आहे.

एलबीटी विभाग वाऱ्यावर

अकोला : नेहरू पार्क लगतच्या स्‍थानिक संस्‍था कर कार्यालयातून संगणकांची चाेरी झाल्याची घटना घडली हाेती. त्यावेळी स्‍थानिक संस्‍था कर विभागातील निरीक्षकाने स्‍थानिक सिव्हिल लाईन पोलीस स्‍टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली हाेती. त्यानंतरही याठिकाणी मनपाकडून सुरक्षा रक्षकाची तैनाती करण्यात आली नसल्याचे समाेर आले आहे. याठिकाणी रात्री असामाजिक तत्त्वांचा वावर लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज आहे.