शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

अकोट तालुक्यात २ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

अकोट : गेल्या १५ दिवसांमध्ये अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत २ हजार ...

अकोट : गेल्या १५ दिवसांमध्ये अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत २ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब असली तरी, याच कालावधीत शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा वाढलेला आलेख चिंताजनक असून प्रशासनाने व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण वाढले आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे चाचण्यांवर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ हजार १० एवढी झाली आहे. त्यामध्ये शहरात १ हजार २७० तर ग्रामीण भागात ७४० रुग्ण बरे झाल्याची २ मेपर्यंतची आकडेवारी आहे. विशेष म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी केवळ १५०४ रुग्ण बरे झाले. यामध्ये आता ५०० बरे झालेल्या रुग्णांची भर पडली आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असले तरी ग्रामीण भागात मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १८६ तर शहरात १३१ रुग्ण आहेत. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गत तीन दिवसांत ग्रामीण भागात हा आकडा २५० पर्यंत पोहोचला आहे. कोरोना संदर्भातील ५ मेच्या दैनंदिन अहवालात तालुक्यातील नांदखेड या एकाच गावात २९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरात कोरोना आटोक्यात येत असला तरी ग्रामीण भागातील ही वाढती संख्या धोक्याची घंटा ठरत आहे.

ग्रामीण भागात शुकशुकाट, तरीही रुग्णसंख्येत वाढ

ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये शुकशुकाट आहे. पोलिसांची गस्त व उन्हाळा यामुळे अनेक जण घरातच आहेत. तर काही हौशी लोक अकोट शहरात बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागात कोरोनासदृश्य रुग्णांचे मृत्यूही होत आहेत. पंचायत समिती स्तरावरील ग्रामपंचायतची यंत्रणा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष न दिल्यास गावेच्या गावे कोरोनाच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे.

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सुट्टीवर

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयात शहर व तालुक्यातील रुग्णांची कोरोना टेस्ट सुरू आहे. अशावेळी ग्रामीण रुग्णालयातील दोन डॉक्टर सुट्टीवर आहेत. तर एक महिला डॉक्टर ४८ तासांपासून कर्तव्यावर आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील गावांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.