शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

अकोट तालुक्यात २ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

अकोट : गेल्या १५ दिवसांमध्ये अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत २ हजार ...

अकोट : गेल्या १५ दिवसांमध्ये अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत २ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब असली तरी, याच कालावधीत शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा वाढलेला आलेख चिंताजनक असून प्रशासनाने व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण वाढले आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे चाचण्यांवर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ हजार १० एवढी झाली आहे. त्यामध्ये शहरात १ हजार २७० तर ग्रामीण भागात ७४० रुग्ण बरे झाल्याची २ मेपर्यंतची आकडेवारी आहे. विशेष म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी केवळ १५०४ रुग्ण बरे झाले. यामध्ये आता ५०० बरे झालेल्या रुग्णांची भर पडली आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असले तरी ग्रामीण भागात मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १८६ तर शहरात १३१ रुग्ण आहेत. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गत तीन दिवसांत ग्रामीण भागात हा आकडा २५० पर्यंत पोहोचला आहे. कोरोना संदर्भातील ५ मेच्या दैनंदिन अहवालात तालुक्यातील नांदखेड या एकाच गावात २९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरात कोरोना आटोक्यात येत असला तरी ग्रामीण भागातील ही वाढती संख्या धोक्याची घंटा ठरत आहे.

ग्रामीण भागात शुकशुकाट, तरीही रुग्णसंख्येत वाढ

ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये शुकशुकाट आहे. पोलिसांची गस्त व उन्हाळा यामुळे अनेक जण घरातच आहेत. तर काही हौशी लोक अकोट शहरात बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागात कोरोनासदृश्य रुग्णांचे मृत्यूही होत आहेत. पंचायत समिती स्तरावरील ग्रामपंचायतची यंत्रणा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष न दिल्यास गावेच्या गावे कोरोनाच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे.

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सुट्टीवर

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयात शहर व तालुक्यातील रुग्णांची कोरोना टेस्ट सुरू आहे. अशावेळी ग्रामीण रुग्णालयातील दोन डॉक्टर सुट्टीवर आहेत. तर एक महिला डॉक्टर ४८ तासांपासून कर्तव्यावर आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील गावांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.