शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नांदखेड ग्रामस्थांच्या एकीजुटीने कोरोना वेशीबाहेरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:18 IST

पातूर : जिल्ह्यासह पातूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, नांदखेड गावाने कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले ...

पातूर : जिल्ह्यासह पातूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, नांदखेड गावाने कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले आहे. आजपर्यंत गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रमामुळे मोठी मदत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकीच्या जोरावर व जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले.

तालुक्यातील नांदखेड हे डोंगरदऱ्यात वसलेले गाव. गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी नेहमीच्या सवयीत बदल करून नवीन जीवनशैली आत्मसात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गंत ग्रामपंचायतीने गावात सर्वेक्षण, नागरिकांची कोरोना चाचणी, दुकानदार आदींवर भर दिला. ग्रामस्थांची एकता ही मोठी ताकद ठरली असून, त्याचा फायदा कोरोनाच्या संकटकाळात झाला आहे. कोरोनादूत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत होते. एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास, अशा प्रकारचा त्रास होत आहे काय, याची त्वरित दखल घेतल्या जात होती. नागरिकांना कोरोनाविषयी माहिती देण्यात येत होती. नागरिकांच्या एकीने व कोरोनाविषयक घेतलेल्या काळजीने नांदखेडवासीयांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.

गावाची लोकसंख्या ७१९

कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंच विजय इंगळे, ग्रा.पं. सचिव शरद उंडाळ, पोलीस पाटील वनिता बोचरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग रेवाळे, शिर्ला उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विलास इंगोले, आरोग्यसेवक प्रदीप विजय मोहोकार, आरोग्यसेविका पौर्णिमा कडू, रेखा सपकाळ, आशा स्वयंसेविका सुकेशिनी वानखेडे, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. संकट काळात एकमेकांची साथ असल्याने कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही.

फोटा: मेल फोटो

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात फवारणी करण्यावर भर दिला. ग्रामस्थांना सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली.

ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. त्यामुळेच कोरोनावर मात करता आली.

-शरद उंडाळ, ग्रामसेवक, नांदखेड

कोसगावात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. याचे श्रेय ग्रामस्थांना आहे. आदिवासीबहुल असलेल्या गावात एकमेकांची साथ मिळाल्यानेच कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यात यशस्वी झाले.

-विजय इंगळे, सरपंच, नांदखेड