शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण आज

By admin | Updated: July 4, 2015 00:23 IST

जिल्हाधिकारी, सीईओ करणार पडताळणी.

अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शनिवार, ४ जुलै रोजी राज्यभरात शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ३ हजार ६२३ अधिकारी-कर्मचार्‍यांची सर्वेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणात आढळणार्‍या शाळाबाह्य बालकाच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येणार असून, त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणल्या जाणार आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षणाचा हक्क असून, त्याचे नाव शाळेच्या पटावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. या वयोगटातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, या अनुषंगाने शनिवार, ४ जुलै रोजी राज्य स्तरावर शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम ह्यकुटुंब सर्वेक्षणाह्णच्या धर्तीवर राबविण्यात येत असून, या उपक्रमामध्ये महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक विभाग तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये सर्वेक्षण होणार असून, ग्रामीण भागासाठी ३ हजार १0४ अधिकार्‍यांची, तर शहरी भागासाठी ५१९ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी, सीईओ करणार पडताळणी

      जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह हे अधिकारी शहरालगत असलेल्या शिवणी, शिवर आणि एमआयडीसी परिसरात शाळाबाह्य बालकांची पडताळणी करणार आहेत.

५0६ बालकांची संख्या वाढणार

  मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५0६ शाळाबाह्य बालकांची नोंद करण्यात आली होती. यंदा ज्या बालकाचे नाव शाळेत दाखल आहे, परंतु पटावर उपस्थिती नाही, अशा बालकांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी शाळाबाह्य बालकांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा समन्वयक जितेंद्र काठोळे यांनी वर्तविली. शाळाबाह्य बालकांना शिक्षक घेणार दत्तक सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक या बालकांना दत्तक घेणार आहेत. त्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्च संबंधीत शिक्षक उचलणार आहेत. बालकांच्या शाळा प्रवेशानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित बालकाचे आधारकार्ड काढण्यात येणार असून, गणवेश आणि पुस्तक वाटप करण्यात येणार आहे.