शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

व्यावसायिकांना लागू केलेली भाडेवाढ नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:46 IST

अकोला : महापालिका प्रशासनाने अकोलेकरांच्या मालमत्ता करात २८ ते ३0 टक्के दरवाढ केली. यासंदर्भात शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित करीत शासनाला जाब विचारला असता शासकीय जागेवरील दुकानांसह मनपाच्या संकुलांमधील व्यावसायिकांना लागू केलेली भाडेवाढ रद्द करीत नगर परिषदेच्या धर्तीवर नवीन दर लागू करणार असल्याचे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सभागृहात नमूद केले. 

ठळक मुद्देआ. गोपीकिशन बाजोरिया यांची लक्षवेधीजिल्हाधिकार्‍यांकडे होईल बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने अकोलेकरांच्या मालमत्ता करात २८ ते ३0 टक्के दरवाढ केली. यासंदर्भात शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित करीत शासनाला जाब विचारला असता शासकीय जागेवरील दुकानांसह मनपाच्या संकुलांमधील व्यावसायिकांना लागू केलेली भाडेवाढ रद्द करीत नगर परिषदेच्या धर्तीवर नवीन दर लागू करणार असल्याचे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सभागृहात नमूद केले. नियमापेक्षा जादा कर आकारणी झालेल्या नागरिकांचा तिढा निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन डॉ. पाटील यांनी यावेळी दिले. महापालिका प्रशासनाने प्रत्येक चार वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून दोन टक्के दराने सुधारित कर प्रणाली लागू करणे अपेक्षित असताना मालमत्ता करांत अव्वाच्या सव्वा दरवाढ केली. मनपा क्षेत्रातील शासनाच्या जागेवर उभारलेल्या तसेच मनपाच्या मालकीच्या व्यावसायिक संकुलातील दुकान  व्यावसायिकांना चक्क दहा ते पंधरा पट अधिक दराची भाडेवाढ केल्याचा मुद्दा शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात उपस्थित केला. मनपाचे धोरण पाहता शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून त्यामध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त व सहायक संचालक नगररचनाकार यांची नेमणूक करण्याची मागणी विधान परिषदेच्या सभागृहात आ. बाजोरिया यांनी लावून धरली. 

काय म्हणाले नगर विकास राज्यमंत्री?आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी उत्तर दिले. शहरातील मालमत्तांवर अत्यल्प कर लागू असल्यामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा  निर्णय घेतला. मनपाच्या अधिनस्त असलेल्या जागेवर वार्षिक भाडेपट्टय़ावर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना ‘पीडब्ल्यूडी’च्या धर्तीवर भाडे  आकारण्यात आले. ही भाडेवाढ मोठय़ा प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालमत्ता कर आकारणीचे अधिकार मनपाला असल्यामुळे या प्रयोजनासाठी अन्य कोणत्याही समितीची नियुक्ती करणे सुसंगत ठरणार नाही. तरीसुद्धा ज्या  नागरिकांना नियमापेक्षा जादा कर आकारणी झाली असेल त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन प्रकरण निकाली काढण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.