शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
2
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
3
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
4
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
5
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
6
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
7
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
8
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
9
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
10
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
11
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
12
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
13
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
14
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
15
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
16
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
17
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
18
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
19
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
20
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

‘आपले सरकार’चा बोजवारा; कंपनीला नऊ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 15:59 IST

अकोला: ग्रामपंचायतमधून देय असलेली प्रमाणपत्रे तसेच विविध योजनांची आॅनलाइन प्रमाणपत्रे देणे, योजनांची कामे करण्यासाठी प्रति ग्रामपंचायत १ लाख ५० हजारांपर्यंत रक्कम उकळूनही त्या सेवांचा सर्वत्र बोजवारा उडाला आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: ग्रामपंचायतमधून देय असलेली प्रमाणपत्रे तसेच विविध योजनांची आॅनलाइन प्रमाणपत्रे देणे, योजनांची कामे करण्यासाठी प्रति ग्रामपंचायत १ लाख ५० हजारांपर्यंत रक्कम उकळूनही त्या सेवांचा सर्वत्र बोजवारा उडाला आहे. त्याशिवाय केंद्र चालकांना गेल्या जूनपासून मानधन न दिल्याने संबंधित कंपनीला ९ लाख ६४ हजार रुपये दंड ठोठावण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे.ग्रामीण जनतेला त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच सर्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पंचायत राज संस्थांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प सुरू केला. त्या केंद्रातून ग्रामस्थांना हवे असलेले १ ते ३३ नमुन्यातील प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार, ई-ग्राम सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. त्या केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी ई-ग्राम प्रकल्पाचे ४७७ ग्रामपंचायतींमध्ये इन्स्टॉलेशनही जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले; मात्र त्यातून दिल्या जाणाºया १ ते ३३ नमुन्याची प्रमाणपत्रे देणे अद्यापही सुरू झालेले नाही, तसेच काही केंद्र चालकांची नियुक्तीही झाली नाही. प्रत्येक ग्रामपंचायतकडून प्रतिमाह १२ हजार ३३१ रुपये रक्कम वसूल करूनही केंद्र चालकांना मानधन देण्यातही सीएससी कंपनीने टाळाटाळ केल्याचा प्रकार राज्यभरात सर्वत्र घडत आहे. याप्रकरणी सीएससी कंपनीला दंड करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आहे.

प्रतिदिवस ४५० रुपये दंडाची कारवाईसीएससी-एसपीव्हीने केंद्र स्थापन केल्यानंतर ६० दिवसांत केंद्र चालकाची नेमणूक करणे बंधनकारक आहे. ठरलेल्या मुदतीत आपले सरकार सेवा केंद्र सुरू न झाल्यास दर दिवसाला ४५० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. केंद्र बंद ठेवल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतकडून प्राप्त माहितीनुसार सीएससी कंपनीवर दंडाची जबाबदारी निश्चित झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रातील अनियमिततेबाबत हा दंड आहे.

ग्रामपंचायतींनी दिले ३ कोटी ७५ लाखआपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतकडून प्रतिमहिना ठरलेली रक्कम १४ व्या वित्त आयोगातून पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या खात्यात जमा करावी लागते. जिल्ह्यात २५४ केंदे्र सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्येक केंद्राची १२ महिन्यांची मिळून १४७९७२ रुपये ग्रामपंचायतींकडून धनादेशाद्वारे घेण्यात आले. ती रक्कम ३ कोटी ७५ लाखांपेक्षाही अधिक आहे. तरीही कंपनीने केंद्रातील सेवांचा बोजवारा उडविला आहे. सोबतच केंद्र चालकांना मानधन देण्यासही टाळाटाळ केल्याने दंडात्मक कारवाईला उशिराने सुरुवात झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय