शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अस्थी विसर्जन थांबवले!

By admin | Updated: June 24, 2017 05:50 IST

कुटुंबातील सदस्यांचा निर्णय : शासनाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी.

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या किसन दगडू बळकार या ५८ वर्षीय शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या धक्क्याने २२ जून रोजी दुपारी १२ वाजता अचानक मृत्यू झाला. ही आत्महत्या नसली, तरी शेतकर्‍यांवर कर्जाचा किती ताण आहे, हे यानिमित्ताने स्पष्टपणे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या शेतकर्‍याच्या निधनाची तत्काळ दखल घेऊन सदर शेतकरी कुटुंबाला मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शोकमग्न कुटुंबाने मयत शेतकर्‍याच्या अस्थीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्ला येथील शेतकरी किसन दगडू बळकार (५८) हे पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलाला पैसे पाठविण्यासाठी तजवीज करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता दुकानदार भीमराव ढाळे यांच्याकडे गेले होते. सदर दुकानदाराने पाच हजार रुपयांची मदत केली. तथापि, गतवर्षीचे ५0 हजार रुपयांचे थकीत पीक कर्ज, सावकाराकडून घेऊन थकीत असलेले कर्ज, पेरणीसाठी जवळ पैसा नसणे, गतवर्षी सोयाबीनची कवडीमोल भावाने केलेली विक्री, यामुळे ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या शेतात गतवर्षी पाच क्विंटल सोयाबीन पिकले होते. ते कवडीमोल भावाने विकले गेले. त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी गुजरात राज्यात स्थलांतर केले होते. तेथे उसाच्या रसवंतीचा दांडा ओढून परिवाराची गुजराण केली. पावसाळा तोंडावर आल्याने ते पेरणीसाठी कुटुंबासह गावी परतले होते; परंतु काही दिवसांपासून पावसानेही दांडी मारल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. या विविध विवंचनेत किसन बळकार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शिर्ला येथे सुवर्ण नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विदर्भातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुवर्ण नदीकाठावर अस्थी संकलित करण्यासाठी नातेवाईक एकत्रित आले होते. त्या सर्वांनी शासनाप्रति रोष व्यक्त केला आहे. कर्जमाफीचा निर्णय तत्काळ लागू झाला असता, तर कदाचित शेतकरी बळकार यांचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना ग्रामस्थांची आहे. मयत शेतकरी किसन दगडू बळकार यांच्या पश्‍चात पत्नी वच्छलाबाई किसन बळकार यांच्यावर जबाबदारी आली आहे. कुटुंबावर असलेल्या कर्जाचे ओझे तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्याबरोबरच पेरायची राहलेली शेती त्यासाठी नसलेला पैसा या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शासनाने मदत करण्याची नितांत गरज आहे. तहसीलदारांनी दिले मदतीचे आश्‍वासनआर्थिक तणावामुळे शेतकरी गतप्राण झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पातूरचे तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी यांनी गतप्राण झालेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. डॉ. पुरी यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शिर्ला येथे भेट देऊन बळकार कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच शासन स्तरावर बळकार यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. शासनामार्फत दिली जाणारी मदत शक्य तेवढय़ा लवकर दिली जाईल, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाला बळकार यांच्या मुलांना प्रवेश दिला जाईल, असेही डॉ. पुरी यांनी यावेळी सांगितले.