शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अस्थी विसर्जन थांबवले!

By admin | Updated: June 24, 2017 05:50 IST

कुटुंबातील सदस्यांचा निर्णय : शासनाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी.

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या किसन दगडू बळकार या ५८ वर्षीय शेतकर्‍याचा हृदयविकाराच्या धक्क्याने २२ जून रोजी दुपारी १२ वाजता अचानक मृत्यू झाला. ही आत्महत्या नसली, तरी शेतकर्‍यांवर कर्जाचा किती ताण आहे, हे यानिमित्ताने स्पष्टपणे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या शेतकर्‍याच्या निधनाची तत्काळ दखल घेऊन सदर शेतकरी कुटुंबाला मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शोकमग्न कुटुंबाने मयत शेतकर्‍याच्या अस्थीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्ला येथील शेतकरी किसन दगडू बळकार (५८) हे पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलाला पैसे पाठविण्यासाठी तजवीज करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता दुकानदार भीमराव ढाळे यांच्याकडे गेले होते. सदर दुकानदाराने पाच हजार रुपयांची मदत केली. तथापि, गतवर्षीचे ५0 हजार रुपयांचे थकीत पीक कर्ज, सावकाराकडून घेऊन थकीत असलेले कर्ज, पेरणीसाठी जवळ पैसा नसणे, गतवर्षी सोयाबीनची कवडीमोल भावाने केलेली विक्री, यामुळे ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या शेतात गतवर्षी पाच क्विंटल सोयाबीन पिकले होते. ते कवडीमोल भावाने विकले गेले. त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी गुजरात राज्यात स्थलांतर केले होते. तेथे उसाच्या रसवंतीचा दांडा ओढून परिवाराची गुजराण केली. पावसाळा तोंडावर आल्याने ते पेरणीसाठी कुटुंबासह गावी परतले होते; परंतु काही दिवसांपासून पावसानेही दांडी मारल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. या विविध विवंचनेत किसन बळकार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शिर्ला येथे सुवर्ण नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विदर्भातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुवर्ण नदीकाठावर अस्थी संकलित करण्यासाठी नातेवाईक एकत्रित आले होते. त्या सर्वांनी शासनाप्रति रोष व्यक्त केला आहे. कर्जमाफीचा निर्णय तत्काळ लागू झाला असता, तर कदाचित शेतकरी बळकार यांचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना ग्रामस्थांची आहे. मयत शेतकरी किसन दगडू बळकार यांच्या पश्‍चात पत्नी वच्छलाबाई किसन बळकार यांच्यावर जबाबदारी आली आहे. कुटुंबावर असलेल्या कर्जाचे ओझे तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्याबरोबरच पेरायची राहलेली शेती त्यासाठी नसलेला पैसा या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शासनाने मदत करण्याची नितांत गरज आहे. तहसीलदारांनी दिले मदतीचे आश्‍वासनआर्थिक तणावामुळे शेतकरी गतप्राण झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पातूरचे तहसीलदार डॉ.आर.जी. पुरी यांनी गतप्राण झालेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. डॉ. पुरी यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शिर्ला येथे भेट देऊन बळकार कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच शासन स्तरावर बळकार यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. शासनामार्फत दिली जाणारी मदत शक्य तेवढय़ा लवकर दिली जाईल, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाला बळकार यांच्या मुलांना प्रवेश दिला जाईल, असेही डॉ. पुरी यांनी यावेळी सांगितले.