शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

विस्तारित प्रकल्पासाठी संघटना आक्रमक

By admin | Updated: July 16, 2017 02:33 IST

पारस विस्तारित प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुराव्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: पारस प्रकल्पाच्या अस्तित्वासाठी प्रकल्प अधिकारी, शासनकर्ते यांनी औष्णिक प्रकल्पाऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पाची मांडणी केली आहे. विदर्भातील महत्त्वाचा विकासाचा प्रकल्प पारस येथेच व्हावा ही शेतकरी, प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची मागणी आहे. ही मागणी शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. १९६५ मध्ये पारस येथे वीज निर्मितीचा मुहूर्तमेढ तत्कालीन मंत्री ब्रिजलाल बियाणी यांच्या प्रयत्नातून झाला. प्रकल्पाच्या विस्तारीकरणात शेतकरी जमिनी देत नाही, म्हणून राजकीय नेत्यांना हाताशी धरून पारस प्रकल्प भंगारात काढला. प्रकल्पाचे विस्तारीकरण न झाल्याने राज्यात मोठय़ा प्रमाणात विजेचा तुटवड्यामुळे जनतेला भारनियमनाचे चटके बसले. अँन्शनची वीज घेण्याची मजल असलेल्यांनी पारस प्रकल्पाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. मध्यंतरी केंद्र व राज्य शासनाने पारस येथेच प्रकल्प करून १२00 मेगावॅट वीज प्रकल्प उभारण्यासाठी जमीन, पाणी, २ धरणे, २ एॅशबंड, रेल्वे लाईन, अधिकारी क्वॉर्टरच्या सुविधा देत प्रथम २५0 मेगावॅटचे पहिले युनिट सुरू केले. दुसर्‍या २५0 मेगावॅटसाठी नियोजन केले. जमिनी भूसंपादित करण्याची वेळ आली. यावेळी शेतकर्‍यांना सुविधा मिळत नसल्याने प्रखर विरोध झाला; परंतु जुन्या प्रकल्पाच्या जागेत उर्वरित लोकप्रतिनिधींच्या मध्यस्तीने शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या. तिसर्‍या ६६0 मेगावॅट प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी प्रकल्पाला विरोध केला नाही; परंतु प्रकल्प अधिकार्‍यांच्या वृत्तीला विरोध केला. प्रकल्प अधिकारी वेळोवेळी वेळ मारून लोकप्रतिनिधींना प्रकल्पाला शेतकरी जमीन देत नाही, मग पारसला प्रकल्प कसा होईल? प्रकल्प पारस येथेच व्हावा ही सर्वांंची इच्छा असताना भूसंपादित शेतकर्‍यांच्या व्यथा, सुशिक्षित बेरोजगारांना त्रास, परिसरातील विकासाची कामे प्रकल्प अधिकारी करीत नाही, शेतकर्‍यांच्या जमिनी अल्पभावात घेऊन प्रकल्पग्रस्तांना सोयी- सवलती मिळवून देण्यास संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष होत आहे. याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी जमिनी न देऊन प्रकल्प अधिकार्‍यांच्या वृत्तीला विरोध केला.परंतु नंतर कृती समितीसमोर प्रकल्प अधिकारी यांनी नमते घेत १२५ हेक्टर शेतजमीन १४१ शेतकर्‍यांकडून संपादित केली. पारस येथे होणारा ६६0 मेगावॅटचा वीज प्रकल्प इतरत्र हलवून तेथे मात्र सौर ऊज्रेचा २५ मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या, याला खरा विरोध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त व सुशिक्षित बेरोजगारच नेतृत्व करणार्‍या खर्‍या राजकीय नेतृत्वाची आज पारस प्रकल्पाला खरी गरज आहे.पारस येथे विस्तारीकरणासाठी भरपूर जमीन आहे. राज्यात फक्त पारसलाच औष्णिक वीज प्रकल्प का नको? परिसरातील नागरिक जमीन, पाणी देऊन प्रदूषण घेण्यास तयार नसताना भुसावळ, परळी येथे ६८0 मेगावॅटच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यातील परळीचा प्रकल्प पाण्याअभावी बंद ठेवावा लागतो. ही वेळ पारसवर अद्याप आली नाही. असे असताना प्रकल्प अधिकारी व शासनकर्ते पारसवर अन्याय करीत आहे. त्याला विरोध करणारे खरे नेतृत्व पुढे येत नाही तोपर्यंत पारस प्रकल्प व तालुक्याच्या विकासाची घडी बसणार नाही एवढेच. अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडणार - मेटे पारस येथे ६६0 मेगावॅटचा औष्णिक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून सरकारवर दबाव आणून हा प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन आ. विनायकराव मेटे यांनी केले.पारस प्रकल्पासाठी १२५ हेक्टर जमीन शेतकर्‍यांकडून खरेदी केली. शेतकर्‍यांनीसुद्धा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शतकर्‍यांनी उदारमनाने शेती दिली. त्याला तडा जाऊ नये. प्रसंगी प्रदेश शिवसंग्रामच्यावतीने लढा उभारून आंदोलनही छेडू, असे आ. मेटे यांनी सांगितले.