शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सेंद्रिय भाजीपाला, धान्य विक्री केंद्र उघडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:56 IST

अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार, प्रचार करण्यावर शासनाचा भर असून, याच अनुषंगाने राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना केली आहे.

अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार, प्रचार करण्यावर शासनाचा भर असून, याच अनुषंगाने राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना केली आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या मिशन अंतर्गत सेंद्रिय शेतीसंदर्भात संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला, शेतमाल विक्री केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनाचा हा वापर कमी न होता अधिक वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकºयांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहेत. कृषी विद्यापीठात सेंद्रिय भाजीपाला, शेतमाल उत्पादन घेतले जात असून, शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरदेखील भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भारत सरकारच्या विभागीय सेंद्रिय शेती केंद्र नागपूरच्यावतीने विदर्भातील शेतकºयांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण देण्यात आले. सेंद्रिय पदार्थांना उपलब्ध असलेली आंतरराष्टÑीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादने, पदार्थांना मोठा वाव असल्याने राज्य शासनाने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले असून, याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना करण्यात आली आहे. याचा प्रसार अधिक गतीने होण्यासाठी शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नसल्याने नव्याने सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे.

- डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनतंर्गत प्रयोगशाळा स्थापन करू न, सेंद्रिय शेतीला लागणारे विविध सेंद्रिय खतांचे उत्पादन, संशोधन करण्यात येणार आहे. तद्वतच भाजीपाला, शेतमाल विक्री करण्यासाठी कृषी विद्यापीठात दालन उघडले जाणार आहे.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ