शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सेंद्रीय जैवतंत्रज्ञान पध्दतीने मिळविणार बोंडअळीवर नियंत्रण ! -  आढावा सभेत डॉ.पंदेकृविचा अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:26 IST

कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला.

ठळक मुद्देयावर्षी खरीपाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी शनिवारी खरीप आढावा सभेत सुक्ष्म नियोजनावर भर दिला. कृषी विद्यापीठाने बोंडअळी व इतर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैवतंत्रज्ञान पध्दतीसोबत,पीक असलेल्या शेतात कामगंधसापळे लावण्यासाठीचे नियोजन केले .खारपाणपट्टयात खरीप हंगामातील सोयबीन पिकानंतर मका व ज्वारी पीक घेण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, शासकीय पातळीवर कृषी विभाग,विद्यापीठांनी नियोजन केले आहे.पूर्व विदर्भात यावर्षी धानानंतर रब्बी ज्वारी तर मध्य व पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात सोयाबीन पिकानंतर मका, करडी व रब्बी ज्वारी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तर कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला.पावसाच्या अनिश्चिततेचा प्रतिकुल परिणाम पिक उत्पादनावर होत असून, मागील वर्षी मोठी आर्थिक झळ शेतकºयांना बसली. उत्पादन तर घटलेच,विविध किड,रोगांनी पिकांचे नुकसान केले, विदर्भातीन कापूस पिकावर जहाल गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने सर्वात जास्त नुकसान झाले.यातून अद्याप शेतकरी सावरला नसल्याने यावर्षी खरीपाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी शनिवारी खरीप आढावा सभेत सुक्ष्म नियोजनावर भर दिला. त्यांनी राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी,कृषी विद्यापीठांचे कुलगुरू ,वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्याकडून नियोजनाची माहिती जाणून घेतली. कृषी विभाग व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शास्त्रज्ञांनी यावर्षी वापरण्यात येणारे पीक तंत्रज्ञान,एकात्मिक किड व्यवस्थापनाचे नियोजन येथे सादर केले.विदर्भात सोयाबीनचा पेरा वाढला असला तरी कापूस नगदी पीक आजही शेतकरी घेतात,मान्सून पूर्व कापूस अलिकडे घेण्याकडे शेतकºयाचा कल वाढला आहे. पण मागील वर्षी मान्सूनपूर्व व खरीप हंगामातील बीटी कापसावर बोंडअळ््यांनी आक्रमण केले. विशेष म्हणजे या बीटी कापसात बोंडअळीला प्रतिबंधक जीन असताना हे घडले. यामुळे देशभर खळबळ उडाली. यावर्षी खरबरदारीचा उपाय म्हणून बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी खरीप आढावा बैठकीत नियोजन सादर केले. या कृषी विद्यापीठाने बोंडअळी व इतर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैवतंत्रज्ञान पध्दतीसोबत,पीक असलेल्या शेतात कामगंधसापळे लावण्यासाठीचे नियोजन केले .पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टयात खरीप हंगामातील सोयबीन पिकानंतर मका व ज्वारी पीक घेण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उन्हाळ््यात भेडसावणाºया वैरणाचा प्रश्न काही अंशी कमी होईल,या संदर्भात शेतकºयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पूर्व विदर्भात पेरसावे तसेच रब्बीत ज्वारी पीक घेण्यात येईल.

- खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा सभेत सादर केले. बोंडअळीवर जैवपध्दतीने नियंत्रण मिळविण्यात येईल.तसेच मका,रब्बी ज्वारी पेरणी करण्याचा प्रयत्न राहील.डॉ. व्ही.एम.भाले,कुलगुरू , डॉ.पंदेकृवि,अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ