शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते नसणा-या शेतक-यांचा निधी कोषागारातच ठेवण्याचे आदेश

By admin | Updated: January 20, 2015 23:39 IST

निधी बँकेत ठेवल्यास अपहाराचे प्रकरण समजून होणार कारवाई.

वाशिम : २0१४ च्या खरिप हंगामातील नुकसानभरपाईची रक्कम, बाधित शेतकर्‍यांच्या उपलब्ध बँक खाते माहितीनुसारच तहसीलदारांनी कोषागारातून काढावी, जास्त रक्कम काढल्यास त्यांच्याविरूद्ध अपहार झाल्याचे समजून कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.खरिप हंगामातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचा सर्वे करून महसूल विभागाने माहिती जमा केली. शासनाने नुकसानग्रस्तांसाठी रक्कम उपलब्ध करून दिली. ही रक्कम थेट बँकेत संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची माहिती आहे, पण त्याचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नाही, अशा ठिकाणी बँक खाते क्रमांक उपलब्ध नसताना संपूर्ण रक्कम तहसीलदारांनी काढली व बँकेमध्ये जमा केल्यास हा प्रकार तात्पुरता अपहार समजून संबंधित तहसीलदारांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश शासनाने १६ जानेवारी रोजी जारी केले आहेत.दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त व अतवृष्टीग्रस्त भागातील शेतकर्‍यांना अर्थसहाय्य म्हणून शासनातर्फे मदत जाहीर केली जाते. २0१४ च्या खरिप हंगामात कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शासनाने बाधित शेतकर्‍यांसाठी नुकसानभरपाई जाहिर केलेली आहे. नुकसानभरपाईची रक्कम संबंधित जिलंना, उपलब्ध निधीनुसार पाठविण्यात आलेली आहे. या मदत वाटपात यापूर्वी काही प्रमाणात अनियमितता झाल्याचे प्रकार निदर्शनात आल्याने, शासनाने मार्गदर्शक सूचना आदेशवजा स्वरुपात जारी केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर, आवश्यक तेवढाच निधी कोषागारातून काढण्यात यावा. बँकनिहाय शेतकर्‍यांची यादी तयार करताना, बँक खाते नसलेल्या शेतकर्‍यांचा समावेश या यादीमध्ये होणार नाही, याची दक्षता राज्यातील सर्व तहसीलदारांनी घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. ज्या शेतकर्‍यांजवळ बँक खाते नाहीत, त्या शेतकर्‍यांचे बँक खाते जन धन योजनेंतर्गत तातडीने उघडण्यात यावे, असेही निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. *..तर शिस्तभंगाची कारवाईशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन तहसीलदारांकडून होते आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. शासन आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अधिकार्‍यांवर तत्काळ शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याची शिफारस जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्त व शासनाकडे करावी लागेल. जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारशीवर कसूरदार अधिकार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.