शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

बँक खाते नसणा-या शेतक-यांचा निधी कोषागारातच ठेवण्याचे आदेश

By admin | Updated: January 20, 2015 23:39 IST

निधी बँकेत ठेवल्यास अपहाराचे प्रकरण समजून होणार कारवाई.

वाशिम : २0१४ च्या खरिप हंगामातील नुकसानभरपाईची रक्कम, बाधित शेतकर्‍यांच्या उपलब्ध बँक खाते माहितीनुसारच तहसीलदारांनी कोषागारातून काढावी, जास्त रक्कम काढल्यास त्यांच्याविरूद्ध अपहार झाल्याचे समजून कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.खरिप हंगामातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचा सर्वे करून महसूल विभागाने माहिती जमा केली. शासनाने नुकसानग्रस्तांसाठी रक्कम उपलब्ध करून दिली. ही रक्कम थेट बँकेत संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची माहिती आहे, पण त्याचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नाही, अशा ठिकाणी बँक खाते क्रमांक उपलब्ध नसताना संपूर्ण रक्कम तहसीलदारांनी काढली व बँकेमध्ये जमा केल्यास हा प्रकार तात्पुरता अपहार समजून संबंधित तहसीलदारांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश शासनाने १६ जानेवारी रोजी जारी केले आहेत.दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त व अतवृष्टीग्रस्त भागातील शेतकर्‍यांना अर्थसहाय्य म्हणून शासनातर्फे मदत जाहीर केली जाते. २0१४ च्या खरिप हंगामात कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शासनाने बाधित शेतकर्‍यांसाठी नुकसानभरपाई जाहिर केलेली आहे. नुकसानभरपाईची रक्कम संबंधित जिलंना, उपलब्ध निधीनुसार पाठविण्यात आलेली आहे. या मदत वाटपात यापूर्वी काही प्रमाणात अनियमितता झाल्याचे प्रकार निदर्शनात आल्याने, शासनाने मार्गदर्शक सूचना आदेशवजा स्वरुपात जारी केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर, आवश्यक तेवढाच निधी कोषागारातून काढण्यात यावा. बँकनिहाय शेतकर्‍यांची यादी तयार करताना, बँक खाते नसलेल्या शेतकर्‍यांचा समावेश या यादीमध्ये होणार नाही, याची दक्षता राज्यातील सर्व तहसीलदारांनी घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. ज्या शेतकर्‍यांजवळ बँक खाते नाहीत, त्या शेतकर्‍यांचे बँक खाते जन धन योजनेंतर्गत तातडीने उघडण्यात यावे, असेही निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. *..तर शिस्तभंगाची कारवाईशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन तहसीलदारांकडून होते आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. शासन आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अधिकार्‍यांवर तत्काळ शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याची शिफारस जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्त व शासनाकडे करावी लागेल. जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारशीवर कसूरदार अधिकार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.