शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
3
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
4
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
5
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
6
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
7
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
8
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
9
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
10
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
12
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
13
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
14
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
15
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
16
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
17
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
18
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
19
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
20
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

तेल्हारा तालुक्यात सातपुडाच्या पायथ्याशी ऑरेंज बेल्ट बनणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

प्रशांत विखे तेल्हारा: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजार हा परिसर फळबागमधील जसा ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जातो, त्याच धर्तीवर तेल्हारा ...

प्रशांत विखे

तेल्हारा: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजार हा परिसर फळबागमधील जसा ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जातो, त्याच धर्तीवर तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या बहुतांश गावात संत्रा पिकांची लागवड झाली असून, अजूनही त्यात वाढ होणार असल्याने भविष्यात हा परिसर ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जाईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील बहुतांश भाग हा सातपुडा पर्वताच्या खाली असल्याने येथील जमीन खरीप व रब्बी पिकांमधील मुख्य पिकांना साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची प्रगती न झाल्याने खंडाळा, वारी,वारखेड, पिंपरखेड, सौंदळा, बोरव्हा, सदरपूर, चितलवाडी, करी रूपागड, करी अडगाव येथील शेतकरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृषी विभागाने परिसरातील जमिनीचा अभ्यास करून येथील शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. सर्वसाधारण शेतकरी हा फळबागेकडे आकर्षित न होण्यामागे अनेक कारणे असताना तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षात परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून या परिसरात संत्रा लागवड करण्यास प्राेत्साहित केले. यामध्ये शेतकरी यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. ४० वर्षात जेवढी संत्रा लागवड या परिसरात झाली नाही, त्यापेक्षा जास्त लागवड दोन ते तीन वर्षात या भागात झाली. अजूनही या भागात फळबाग लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

------------------बाॅक्स----------------

२०१८ पर्यंत ३०० हेक्टरवर हाेती संत्रा लागवड

१९९१ ला प्रथम संत्रा लागवड तालुक्यात झाली हाेती. २०१८ पर्यंत केवळ ३०० हेक्टरवर संत्रा लागवड झाली होती, मात्र सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षात तब्बल ४५० हेक्टरवर लागवड झाली तर मागील दोन वर्षातच ४२१ हेक्टरवर संत्रा लागवड झाली आहे.

------------------काेट----------------

तेल्हारा परिसरातील जमिनीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी त्याला साथ देत संत्रा लागवड केली. या क्षेत्रात वाढ करून अमरावती जिल्ह्यातील संत्र्यापेक्षा जास्त चविष्ट हा संत्रा राहणार असल्याने याची मागणीसुद्धा जास्त राहील. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ हाेऊन तालुक्याच्या विकासामध्ये भर पडेल.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा