शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

तेल्हारा तालुक्यात सातपुडाच्या पायथ्याशी ऑरेंज बेल्ट बनणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

प्रशांत विखे तेल्हारा: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजार हा परिसर फळबागमधील जसा ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जातो, त्याच धर्तीवर तेल्हारा ...

प्रशांत विखे

तेल्हारा: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजार हा परिसर फळबागमधील जसा ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जातो, त्याच धर्तीवर तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या बहुतांश गावात संत्रा पिकांची लागवड झाली असून, अजूनही त्यात वाढ होणार असल्याने भविष्यात हा परिसर ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जाईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील बहुतांश भाग हा सातपुडा पर्वताच्या खाली असल्याने येथील जमीन खरीप व रब्बी पिकांमधील मुख्य पिकांना साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची प्रगती न झाल्याने खंडाळा, वारी,वारखेड, पिंपरखेड, सौंदळा, बोरव्हा, सदरपूर, चितलवाडी, करी रूपागड, करी अडगाव येथील शेतकरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृषी विभागाने परिसरातील जमिनीचा अभ्यास करून येथील शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. सर्वसाधारण शेतकरी हा फळबागेकडे आकर्षित न होण्यामागे अनेक कारणे असताना तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षात परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून या परिसरात संत्रा लागवड करण्यास प्राेत्साहित केले. यामध्ये शेतकरी यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. ४० वर्षात जेवढी संत्रा लागवड या परिसरात झाली नाही, त्यापेक्षा जास्त लागवड दोन ते तीन वर्षात या भागात झाली. अजूनही या भागात फळबाग लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

------------------बाॅक्स----------------

२०१८ पर्यंत ३०० हेक्टरवर हाेती संत्रा लागवड

१९९१ ला प्रथम संत्रा लागवड तालुक्यात झाली हाेती. २०१८ पर्यंत केवळ ३०० हेक्टरवर संत्रा लागवड झाली होती, मात्र सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षात तब्बल ४५० हेक्टरवर लागवड झाली तर मागील दोन वर्षातच ४२१ हेक्टरवर संत्रा लागवड झाली आहे.

------------------काेट----------------

तेल्हारा परिसरातील जमिनीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी त्याला साथ देत संत्रा लागवड केली. या क्षेत्रात वाढ करून अमरावती जिल्ह्यातील संत्र्यापेक्षा जास्त चविष्ट हा संत्रा राहणार असल्याने याची मागणीसुद्धा जास्त राहील. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ हाेऊन तालुक्याच्या विकासामध्ये भर पडेल.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा