शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २२० कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: May 19, 2017 01:32 IST

पावसाळा तोंडावर; पीक कर्ज वाटप संथ गतीने!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले असले, तरी त्यापैकी १० मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असला, तरी पीक कर्जाचे वाटप संथ गतीने सुरू असल्याची स्थिती आहे. त्यानुषंगाने यावर्षी जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी उरला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून, खरीप पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामध्ये पेरणीसाठी बी-बियाणे, खते आणि इतर खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक कर्जाच्या मागणीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी गत १० मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत बँकांमार्फत करण्यात आलेले पीक कर्जाचे वाटप बघता, पावसाळा तोंडावर येत असला, तरी पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया मात्र संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप पेरण्या सुरू होईपर्यंत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पेरणीपूर्वी कर्जाचा लाभ मिळणार? पावसाळा तोंडावर आला असून, पेरणीसाठी बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे; परंतु पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने, बियाणे आणि खतांचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी १० मेपर्यंत २२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जुलै अखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक.