शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

शिक्षक भरतीमध्ये विदर्भात केवळ ८३४ जागाच रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:48 IST

अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत.

- नितीन गव्हाळे

अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत. त्यातुलनेत उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागात शिक्षकांच्या सर्वाधिक ९ हजार ४३२ जागा रिक्त आहेत. या जागा पसंतीक्रम व जात संवर्गनिहाय निवडण्याची संधी उमेदवारांना मिळणार असली तरी विदर्भातील हजारो उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.राज्यातील शाळांमधील रिक्त दहा हजार पदांवर शिक्षक भरती होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शिक्षण संस्थांनी जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध केल्या. या सर्वात जास्त रिक्त पदांच्या जाहिराती या उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागातील आहेत. विदर्भात अकराही जिल्ह्यांमध्ये त्या तुलनेत फारच नगण्य आहेत. शिक्षक भरतीच्या सर्व जागांसाठी शिक्षकांना अर्ज करता येत असले तरी, विदर्भातील बेरोजगार शिक्षकांना उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण भागातील शाळांमधील रिक्त पदांवर संधी मिळेल का? याविषयी शंका आहे. विदर्भात जागा कमी असल्यामुळे या भागातील शिक्षकांना उर्वरित महाराष्ट्रातील जागांसाठी आॅनलाइन अर्ज व नोंदणी करावी लागणार आहे; परंतु उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षण संस्था वैदर्भीय उमेदवारांना संधी उपलब्ध करून देतील का, याविषयी उमेदवारांना संभ्रम आहे. शिक्षक भरतीमध्ये विदर्भाच्या तुलनेमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवारांनाच अधिक संधी मिळणार असल्याने, वैदर्भीय शिक्षक उमेदवारांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

विदर्भातील         रिक्त जागाअकोला-                  ५८अमरावती                ३३भंडारा-                    ९४बुलडाणा-               २६८चंद्रपूर-                     ४0गडचिरोली-             १0५गोंदिया-                   ८९वाशिम-                   ३३यवतमाळ-              ११४शिक्षक भरती ही संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आहे. भरतीमध्ये कोणताही दुजाभाव होणार नाही. केवळ गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांची निवड होणार आहे. ज्याच्याकडे गुणवत्ता. त्यालाच संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी काळजी करू नये.-विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त,महाराष्ट्र राज्य.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती