शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या केवळ २५ उपाययोजनांची कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७ मेपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात ...

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७ मेपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७४ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील ६३१ गावांमध्ये ६९९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, उपाययोजनांच्या कामांकरिता १४ कोटी ९० लाख २९ हजार रुपये अपेक्षित खर्चाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. कृती आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येत आहेत. प्रशासकीय मान्यतेनंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ७ मेपर्यंत जिल्ह्यातील २२ गावांत केवळ २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७४ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूर्ण करण्यात आलेली

उपाययोजनांची अशी आहेत कामे!

जिल्ह्यातील २२ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये १४ गावांसाठी १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि ८ गावांत ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

१८७ उपाययोजनांच्या कामांना

प्रशासकीय मान्यता!

पाणीटंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनापैकी २७३ गावांसाठी १८७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली.

पावसाळा २३ दिवसांवर;

उपाययोजना पूर्ण होणार?

पावसाळा सुरू होण्यास केवळ २३ दिवसांचा कालावधी उरला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्हयातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी प्रलंबित उपाययोजनांची कामे येत्या २३ दिवसांत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.