शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या केवळ २५ उपाययोजनांची कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७ मेपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात ...

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी ७ मेपर्यंत जिल्ह्यातील केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७४ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील ६३१ गावांमध्ये ६९९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, उपाययोजनांच्या कामांकरिता १४ कोटी ९० लाख २९ हजार रुपये अपेक्षित खर्चाच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. कृती आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येत आहेत. प्रशासकीय मान्यतेनंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ७ मेपर्यंत जिल्ह्यातील २२ गावांत केवळ २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७४ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूर्ण करण्यात आलेली

उपाययोजनांची अशी आहेत कामे!

जिल्ह्यातील २२ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये १४ गावांसाठी १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि ८ गावांत ९ कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

१८७ उपाययोजनांच्या कामांना

प्रशासकीय मान्यता!

पाणीटंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनापैकी २७३ गावांसाठी १८७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत केवळ २२ गावांत २५ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली.

पावसाळा २३ दिवसांवर;

उपाययोजना पूर्ण होणार?

पावसाळा सुरू होण्यास केवळ २३ दिवसांचा कालावधी उरला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्हयातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी प्रलंबित उपाययोजनांची कामे येत्या २३ दिवसांत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.