शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार, केवळ २० टक्के विद्यार्थ्यांचेच अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 10:26 IST

Only 20% of students apply for Polytechnic : १५ दिवसांपासून पॉलिटेक्निक कॉलेजद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.

अकोला : कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. कोणते करिअर निवडायचे याबाबतही संभ्रम आहे. पॉलिटेक्निकचे तंत्रही बिघडणार असल्याचे चित्र यंदा दिसून येत आहे. १५ दिवसांपासून पॉलिटेक्निक कॉलेजद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ २० टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश अर्ज केले आहेत. एकेकाळी पॉलिटेक्निकला मोठी मागणी होती. चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. परंतु, अलीकडच्या काळात अभियांत्रिकी विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यामुळे पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील शेकडो जागा दरवर्षी रिक्त राहत आहेत. यंदाही तीच परिस्थिती राहण्याची शक्यता दिसून येत आहे. कोराेनामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शासनाने यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता बारावीचा सुद्धा त्याच आधारे निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना थेट इंजिनिअरिंग, मेडिकलला पसंती दिल्यामुळे पॉलिटेक्निकच्या जागा रिक्त राहण्याची भीती आहे. तसेच पॉलिटेक्निकऐवजी आयटीआयला विद्यार्थी पसंती देत असल्यामुळेही पॉलिटेक्निकच्या जागा रिक्त राहत आहेत. आता नुकताच दहावीचा निकाल लागला असून, विद्यार्थ्यांनी प्रवेेश अर्जाची तारीख वाढविण्याची मागणी केली आहे.जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - ०२एकूण प्रवेश क्षमता - ५४०आतापर्यंत केलेले अर्ज - ३२३अर्ज भरण्याची अखेरची मुदत- २३ जुलैदहावी निकालानंतर येणार गतीपॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू करण्यात आली. परंतु, इयत्ता दहावीचा निकाल लागायचा असल्याने, बैठक क्रमांक नसल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज कमी झाले. आता १६ जुलै रोजी दहावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर पाॅलिटेक्निकच्या प्रवेशाला गती मिळण्याची शक्यता आहे. दहावीच्या निकालानंतर मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थी करिअर निवडतात. त्यामुळे टक्केवारीनुसार विद्यार्थी पॉलिटेक्निककडे वळतात. त्यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशाला काही दिवसांत गती येण्याची शक्यता आहे. २३ जुलै ही ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.गेल्यावर्षी १० टक्के जागा रिक्तयंदा दहावीची परीक्षा रद्द झाली. निकालही उशिरा लागला. दहावीचा निकाल न लागताच तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली. प्रवेश अर्ज करताना, विद्यार्थ्यांना मार्कशिट, बैठक क्रमांक द्यावा लागतो. परंतु निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेश अर्जच केले नाहीत. गतवर्षी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्ज केले होते. तरीही १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.तीन दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल लागला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश अर्ज प्रक्रियेला गती मिळणार आहे. गत दोन-तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे कल वाढला आहे. यंदाही पॉलिटेक्निक कॉलेजमधील सर्व जागा भरण्याची अपेक्षा आहे. २३ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने, विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेशासाठी अर्ज करावेत.-डॉ. अरुण गुल्हाने, प्राचार्यशासकीय तंत्रनिकेतन, मूर्तिजापूरदहावीचा निकाल लागायचा होता. गुणपत्रिका, टक्केवारी माहिती नसल्याशिवाय अर्ज कसा करावा. शिवाय बैठक क्रमांकही नव्हता. त्यामुळे पॉलिटेक्निकच काय, अन्य ठिकाणी प्रवेश घेण्याचा प्रश्नच नव्हता. आता दहावीचा निकाल लागला आहे. मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे असल्याने, त्यादृष्टीने पुढील प्रवेश घेणार आहे.-प्रियांशु लक्ष्मण शिरसाट, विद्यार्थीदहावीचा निकाल लागल्याशिवाय पुढील दिशा ठरविता येत नव्हती. निकाल, गुणपत्रिकेशिवाय कोणत्या क्षेत्राकडे जायचे हे ठरविले नव्हते. आता निकाल लागला आहे. गुणही चांगले मिळाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र निवडण्याचे ठरविले आहे.-ईशा नारायण पवार, विद्यार्थिनी
टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र