शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपये कर्जाचा लाभ!

By admin | Updated: July 11, 2017 01:35 IST

तातडीच्या कर्ज वाटपाचा बोजवारा : राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वाटपाकडे पाठ

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेनंतर, खरीप पेरणीकरिता बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटपाचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत असल्याचा निर्णय शासनामार्फत गत २८ जून रोजी काढण्यात आला. त्यापूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर, थकबाकीदार शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत गत १४ जून रोजी देण्यात आले. त्यानुसार ३० जून २०१६ पर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मागणीनुसार १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत १६ जून रोजी दिले. त्यानंतर ८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील केवळ १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांकडून वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील खरीप पेरण्या ४५ टक्के आटोपल्या असून, केवळ १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप पेरणीकरिता बियाणे व खते खरेदीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याच्या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर येत आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वाटप ‘झीरो’!८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँकेमार्फत जिल्ह्यात १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना १८ लाख ४० हजार रुपयांचे तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून मात्र अद्याप एकाही थकबाकीदार शेतकऱ्याला तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याचे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रमाण ‘झीरो ’ आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले. त्यामध्ये ८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १३३ शेतकऱ्यांना १३ लाख ३० हजार रुपये आणि ग्रामीण बँकेकडून ५१ शेतकऱ्यांना ५ लाख १० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)