शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपये कर्जाचा लाभ!

By admin | Updated: July 11, 2017 01:35 IST

तातडीच्या कर्ज वाटपाचा बोजवारा : राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वाटपाकडे पाठ

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत केवळ १८४ शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीच्या कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेनंतर, खरीप पेरणीकरिता बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटपाचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत असल्याचा निर्णय शासनामार्फत गत २८ जून रोजी काढण्यात आला. त्यापूर्वी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर, थकबाकीदार शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत गत १४ जून रोजी देण्यात आले. त्यानुसार ३० जून २०१६ पर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मागणीनुसार १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत १६ जून रोजी दिले. त्यानंतर ८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील केवळ १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांकडून वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील खरीप पेरण्या ४५ टक्के आटोपल्या असून, केवळ १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप पेरणीकरिता बियाणे व खते खरेदीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याच्या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर येत आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वाटप ‘झीरो’!८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँकेमार्फत जिल्ह्यात १८४ थकबाकीदार शेतकऱ्यांना १८ लाख ४० हजार रुपयांचे तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून मात्र अद्याप एकाही थकबाकीदार शेतकऱ्याला तातडीचे कर्ज वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याचे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रमाण ‘झीरो ’ आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले. त्यामध्ये ८ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १३३ शेतकऱ्यांना १३ लाख ३० हजार रुपये आणि ग्रामीण बँकेकडून ५१ शेतकऱ्यांना ५ लाख १० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)