शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

अमरावती विभागातील प्रकल्पांत केवळ ११ टक्के जलसाठा

By admin | Updated: June 11, 2016 02:48 IST

अमरावती विभागात २८९ गावांत २७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रफुल्ल बाणगावकर / कारंजा लाड (जि. वाशिम) अमरावती विभागातील लहान- मोठे मिळून एकू ण ४६0 जलप्रकल्पात केवळ ११ टक्के जलसाठा उरला असून, मॉन्सूनचे दमदार आगमन झाले नाही, तर विभागातील पाचही जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.मागील तीन वर्षांपासून अमरावती विभागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील विविध ठिकाणच्या जलप्रकल्पात पुरेसा जलसंचय झाला नाही. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वीच अनेक जलप्रकल्प कोरडे झाले, तर काही प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती मिळून या पाच जिल्ह्यांत एकूण लहान-मोठे ४६0 जलप्रकल्प आहेत. या जलप्रकल्पात ९ जून २0१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागात अमरावती येथील उध्र्व वर्धा, यवतमाळ येथील पूस, बेंबळा आणि अरुणावती, अकोला येथील काटेपूर्णा, तर बुलडाणा येथील वाण, नळगंगा, पेनटाकळी, आणि खडकपूर्णा असे एकूण ९ मोठे जलप्रकल्प आहेत. त्यापैकी पूस, पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे प्रकल्प कोरडे पडले असून, अरुणावती प्रकल्पात ३ टक्के, काटेपूर्णा प्रकल्पात २ टक्के, तर नळगंगा प्रकल्पात ४ टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात १३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील वाण प्रकल्पात ३७ टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता येत्या काही दिवसांत मॉन्सूनचे आगमन जोरदार झाले नाही, तर पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमरावती विभागात प्रशासनाच्यावतीने एकूण २८९ गावांत २७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.