शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

अमरावती विभागातील प्रकल्पांत केवळ ११ टक्के जलसाठा

By admin | Updated: June 11, 2016 02:48 IST

अमरावती विभागात २८९ गावांत २७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रफुल्ल बाणगावकर / कारंजा लाड (जि. वाशिम) अमरावती विभागातील लहान- मोठे मिळून एकू ण ४६0 जलप्रकल्पात केवळ ११ टक्के जलसाठा उरला असून, मॉन्सूनचे दमदार आगमन झाले नाही, तर विभागातील पाचही जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.मागील तीन वर्षांपासून अमरावती विभागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील विविध ठिकाणच्या जलप्रकल्पात पुरेसा जलसंचय झाला नाही. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वीच अनेक जलप्रकल्प कोरडे झाले, तर काही प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती मिळून या पाच जिल्ह्यांत एकूण लहान-मोठे ४६0 जलप्रकल्प आहेत. या जलप्रकल्पात ९ जून २0१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागात अमरावती येथील उध्र्व वर्धा, यवतमाळ येथील पूस, बेंबळा आणि अरुणावती, अकोला येथील काटेपूर्णा, तर बुलडाणा येथील वाण, नळगंगा, पेनटाकळी, आणि खडकपूर्णा असे एकूण ९ मोठे जलप्रकल्प आहेत. त्यापैकी पूस, पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे प्रकल्प कोरडे पडले असून, अरुणावती प्रकल्पात ३ टक्के, काटेपूर्णा प्रकल्पात २ टक्के, तर नळगंगा प्रकल्पात ४ टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात १३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील वाण प्रकल्पात ३७ टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता येत्या काही दिवसांत मॉन्सूनचे आगमन जोरदार झाले नाही, तर पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमरावती विभागात प्रशासनाच्यावतीने एकूण २८९ गावांत २७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.