शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कापूस खरेदीसाठीही ऑनलाइन नोंदणी अनिवार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:38 IST

अकोला : डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टासाठी शासन आता सर्वच प्रक्रिया आनलाइन करीत आहे. पीक विमा, कर्जमाफी, उडीद, मूग खरेदीनंतर आता कापूस खरेदीसुद्धा ऑनलाइन करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे. 

ठळक मुद्देआजपासून खरेदीपीक विमा, कर्जमाफी, धान्य खरेदीही ऑनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टासाठी शासन आता सर्वच प्रक्रिया आनलाइन करीत आहे. पीक विमा, कर्जमाफी, उडीद, मूग खरेदीनंतर आता कापूस खरेदीसुद्धा ऑनलाइन करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. अकोला व तेल्हारा तसेच वाशिममध्ये मानोरा आणि कारंजा व बुलडाण्यात तीन केंद्रांवर खरेदी करणार आहे. सोमवारी यासंदर्भात सीसीआयसोबत पणन महासंघाचा करार झाला आहे; मात्र राज्य सरकारने पणन महासंघाला खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याने २५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार आहे.  दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कापसाच्या वाणानुसार हमीभाव निश्‍चित करण्यात आलेला आहे. यामध्ये बन्नी व ब्रह्म या जातीला ४ हजार २२0 रुपये प्रतिक्विंटल, तर एच-४, एच-६ ला ४ हजार २२0 व एलआरए ५१६६ या जातीला ४ हजार १२0 रुपये हमीभाव राहणार आहे. सद्यस्थितीत प्रतवारीनुसार कापसाला चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव खुल्या बाजारात मिळत आहे. यंदाच्या हंगामात पेरणीपासून पावसाची तूट असल्यामुळे कपाशीची पेरणी उशिरा झाली असून, आधीच त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांना आता कापसाच्या विक्रीपूर्व बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी सात-बारा उतारा, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याशिवाय शेतकर्‍यांच्या कापसाची खरेदी होणार नाही. यापूर्वी शेतकर्‍यांना केवळ सात-बारा द्यावा लागत होता; परंतु आता ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

पणन महासंघाच्यावतीने राज्यात ६0 केंद्रांवर खरेदीची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार बुधवारपासून कापूस खरेदी करण्यात येईल. खरेदीसंदर्भातील तयारी महासंघाने केली आहे. कापसाच्या भाववाढीबाबत शेतकर्‍यांना अपेक्षा आहेत. शेजारच्या गुजरात राज्यात कापसाला ५00 रुपये बोनस जाहीर करण्यात आला. त्यामुळे आपल्याही राज्यात किमान एक हजार रुपये बोनस सरकारने दिला पाहिजे, ही शेतकर्‍यांची भावना असून, ती सरकारपर्यंत निश्‍चितच पोहोचवणार.- प्रसेनजित पाटील,  उपाध्यक्ष, पणन महासंघ, मुंबई.

टॅग्स :agricultureशेती