शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कापूस खरेदीसाठीही ऑनलाइन नोंदणी अनिवार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:38 IST

अकोला : डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टासाठी शासन आता सर्वच प्रक्रिया आनलाइन करीत आहे. पीक विमा, कर्जमाफी, उडीद, मूग खरेदीनंतर आता कापूस खरेदीसुद्धा ऑनलाइन करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे. 

ठळक मुद्देआजपासून खरेदीपीक विमा, कर्जमाफी, धान्य खरेदीही ऑनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टासाठी शासन आता सर्वच प्रक्रिया आनलाइन करीत आहे. पीक विमा, कर्जमाफी, उडीद, मूग खरेदीनंतर आता कापूस खरेदीसुद्धा ऑनलाइन करण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. अकोला व तेल्हारा तसेच वाशिममध्ये मानोरा आणि कारंजा व बुलडाण्यात तीन केंद्रांवर खरेदी करणार आहे. सोमवारी यासंदर्भात सीसीआयसोबत पणन महासंघाचा करार झाला आहे; मात्र राज्य सरकारने पणन महासंघाला खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याने २५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार आहे.  दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कापसाच्या वाणानुसार हमीभाव निश्‍चित करण्यात आलेला आहे. यामध्ये बन्नी व ब्रह्म या जातीला ४ हजार २२0 रुपये प्रतिक्विंटल, तर एच-४, एच-६ ला ४ हजार २२0 व एलआरए ५१६६ या जातीला ४ हजार १२0 रुपये हमीभाव राहणार आहे. सद्यस्थितीत प्रतवारीनुसार कापसाला चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव खुल्या बाजारात मिळत आहे. यंदाच्या हंगामात पेरणीपासून पावसाची तूट असल्यामुळे कपाशीची पेरणी उशिरा झाली असून, आधीच त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांना आता कापसाच्या विक्रीपूर्व बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी सात-बारा उतारा, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याशिवाय शेतकर्‍यांच्या कापसाची खरेदी होणार नाही. यापूर्वी शेतकर्‍यांना केवळ सात-बारा द्यावा लागत होता; परंतु आता ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

पणन महासंघाच्यावतीने राज्यात ६0 केंद्रांवर खरेदीची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार बुधवारपासून कापूस खरेदी करण्यात येईल. खरेदीसंदर्भातील तयारी महासंघाने केली आहे. कापसाच्या भाववाढीबाबत शेतकर्‍यांना अपेक्षा आहेत. शेजारच्या गुजरात राज्यात कापसाला ५00 रुपये बोनस जाहीर करण्यात आला. त्यामुळे आपल्याही राज्यात किमान एक हजार रुपये बोनस सरकारने दिला पाहिजे, ही शेतकर्‍यांची भावना असून, ती सरकारपर्यंत निश्‍चितच पोहोचवणार.- प्रसेनजित पाटील,  उपाध्यक्ष, पणन महासंघ, मुंबई.

टॅग्स :agricultureशेती